चिंताजनक! राज्यात वाढतायत चिकनगुनियाचे रुग्ण; डासांची शक्ती चारपट वाढली

नागपूर : राज्यात चिकनगुनिया (Chikungunya) आणि डेंग्यूसारख्या (Dengue) डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे रुग्ण चिंताजनक पातळीवर वाढत आहेत. हवामान बदलामुळे डासांची शक्ती आणि प्रजननक्षमता चारपट वाढली आहे, असे चेन्नईच्या आरोग्य सल्लागार डॉ. जयालक्ष्मी श्रीधर यांनी सांगितले.


नागपूरमध्ये आयोजित कार्यशाळेत डॉ. श्रीधर यांनी स्पष्ट केले की हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, आणि अधिक पाऊस यांचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे डासांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः राज्यात सध्या डेंग्यू आणि चिकनगुनियाची साथ सुरू असून डासांमुळे हे आजार अधिक वेगाने पसरत आहेत.


हवामान बदलामुळे डासांची भौगोलिक व्याप्ती वाढली आहे, ज्यामुळे भारतासह जगभरात डासांमुळे होणाऱ्या आजारांचा प्रसार वाढला आहे. उदाहरणार्थ, एडिस एजिप्ती नावाच्या डासामुळे होणारा डेंग्यू २८.६ टक्के, तर एई अल्बोपिक्टस डासामुळे होणारा डेंग्यू २७.७ टक्क्यांनी वाढला आहे. जगभरात दरवर्षी डासांमुळे ७० कोटी लोकांना आजार होतात आणि दहा लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो.


डॉ. श्रीधर यांनी हेही सांगितले की जागतिक तापमानवाढीमुळे हृदय, किडनी, आणि यकृताचे आजार झपाट्याने वाढत आहेत, तसेच महिला व पुरुषांमध्ये व्यंध्यत्वाचा धोका वाढला आहे. या बदलांमुळे दरवर्षी ६.६७ दशलक्ष मृत्यू होतात.

Comments
Add Comment

Diwali Firecracker Ban 2025 : फटाक्यांशिवाय दिवाळी? पुण्यापाठोपाठ मुंबईतही 'नो क्रॅकर'चा कडक नियम! मुंबईकरांची यंदाची दिवाळी 'शांत'?

मुंबई: "दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदा तोटा" या उक्तीप्रमाणे अवघ्या आठवड्याभरावर आलेल्या दिवाळीमुळे मुंबईतील

Kolhapur Student Assault Video : ‘रँगिंग’च्या नावाखाली दहशत! हाॅस्टेलमध्ये सर्रास 'रॅगिंग' की टोळीयुद्ध? तळसंदे पाठोपाठ पेठवडगावमध्येही विद्यार्थ्यांची अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमधील खासगी वसतिगृहे (Hostel) आता विद्यार्थ्यांच्या अमानुष

'हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही': उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा सज्जड इशारा

३२ हजार कोटींच्या मदतीने विरोधकांचे राजकारण हाणून पाडले; 'मुंबई मनपासाठी थोडा हंबरडा शिल्लक ठेवावा' छत्रपती

Fake Currency: अरे बापरे! पोलिसानेच काढला होता बनावट नोटांचा कारखाना; असा केला पर्दाफाश!

'सिद्धकला चहा'मधून १ कोटींच्या बनावट नोटा जप्त; पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केला मोठा खुलासा मिरज (सांगली):

भारताचा इतिहास पराभवाचा नव्हे संघर्षाचा”- सरसंघचालक

नागपूर : भारतावर अनादी काळापासून सातत्याने हल्ले होत राहिले. परंतु, कुठलाही परकीय आक्रांता एक रात्र देखील

जिथे शक्य तिथे महायुती म्हणजे काय? महायुतीमध्ये नेमकं काय घडतंय? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...

नाशिक : पुढील काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका)