Onion News : महत्वाची बातमी! कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : सध्या बाजारात सर्वच भाजीपाल्यांचे दर वाढत आहेत. अशातच कांद्याचे दरसुद्धा (Onion Rate) वाढले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे, त्या शेतकऱ्यांना (Farmers) याचा चांगला फायदा होत आहे. मात्र, कांद्याचे दर वाढत असताना सरकारनं दुसऱ्या बाजूला मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं कांद्याचे दर कमी करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. सरकार आता दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi NCR) ३५ रुपये किलो दराने कांद्याची विक्री करणार आहे. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वाढत्या दरातून सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे.




दिल्ली आणि लगतच्या शहरात कांदा ६० रुपये किलोवर



कांद्याच्या दरात दिल्ली-एनसीआरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या ठिकाणांना दिलासा देण्यासाठी सरकारनं आता कमी दरात कांद्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील ग्राहकांना यामुळं मोठा दिलासा मिळणार आहे. राष्ट्रीय राजधानी आणि लगतच्या शहरांमध्ये कांद्याचा भाव ६० रुपये किलोवर पोहोचल्यानंतर केंद्र सरकारने स्वत:हून सवलतीच्या दरात कांदा विकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार आता या भागात ३५ रुपये किलोने कांदा विकणार आहे. बाजारातील भाव मोडीत काढणे हे सरकारचं उद्दिष्ट आहे.



दिल्ली-एनसीआरमध्ये आजपासून कांद्याची विक्री सुरु


दरम्यान, दिल्ली-एनसीआरमध्ये सरकार आजपासून कांद्याची विक्री सुरू करणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने यासाठी नाफेड आणि एनसीसीएफला आदेश दिले आहेत. सर्वसामान्यांना हे दोन्ही सरकारी युनिट ३५ रुपये किलो दराने कांदा उपलब्ध करून देणार आहेत.



एनसीसीएफ आणि नाफेडच्या माध्यमातून कांद्याची विक्री


नाफेड आणि एनसीसीएफ या दोन्ही सरकारी संस्था सर्वसामान्यांना सरकारच्या वतीने स्वस्त दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचं काम करतात. या दोन्ही संस्था मध्यवर्ती दुकाने, मोबाईल व्हॅन आणि इतर माध्यमातून सवलतीच्या भावात खाद्यपदार्थ लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. गतवर्षी देशभरात कांद्याचे आणि टोमॅटोचे भाव प्रचंड वाढले असताना सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून लोकांना स्वस्त दरामध्ये टोमॅटो आणि कांदे उपलब्ध करून दिले होते.



डाळीसह तांदळाची देखील स्वस्त भावात विक्री


महागाईपासून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार विविध निर्णय घेत आहे. सरकार सध्या स्वस्त दरात पीठ, डाळ, तांदूळ विकत आहे. गेल्या वर्षीच सरकारने ‘भारत’ या ब्रँड नावाने बाजारात पीठ, डाळी आणि तांदूळ आणले होते.

Comments
Add Comment

Monkey's Pool Party Inside Taj Mahal : ताजमहालच्या फाउंटनमध्ये माकडांची 'पूल-पार्टी'! उकाड्यापासून वाचण्यासाठी वानरसेनेची धम्माल; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत आहेत. या कडक उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी जशी

India Slam Pakistan at UN : 'खोट्या गोष्टी पसरवण्याची पाकिस्तानला सवय', संयुक्त राष्ट्रात काश्मीर प्रश्नावर भारताची स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) त्याची खरी जागा पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. जम्मू आणि

Cockroach Janta Party : नावात 'कॉकरोच' पण दिल्लीच्या उन्हात निघाली हवा! 'VIP' नेते सौरव दास यांचा सरंजामशाही चेहरा उघडा

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत एकीकडे 'नीट २०२६' (NEET 2026) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश

KCET UGCET निकाल २०२६ जाहीर : यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचा डंका; मुलांपेक्षा तब्बल ४१ हजार अधिक मुलींची परीक्षेला उपस्थिती

बंगळुरू : कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाकडून (KEA) घेण्यात आलेल्या बहुचर्चित 'कर्नाटक सामायिक प्रवेश परीक्षेचा' (KCET UGCET 2026)

Punjab Accident: एका क्षणात होत्याचं नव्हतं; अस्थी विसर्जनासाठी निघालेल्या कुटुंबाचा भीषण अपघात, ९ जण जागीच ठार

पंजाब : पंजाबमधील फिरोजपूर येथे शनिवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात (Road Accident) ९ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर

Ludhiana Blast : रेल्वे स्थानकावर अचानक भीषण स्फोटाचा आवाज! लुधियाना स्टेशनवर खळबळ; सुरक्षा यंत्रणा सतर्क

लुधियाना : पंजाबमधील लुधियाना रेल्वे स्थानक शुक्रवारी (५ जून) सकाळी झालेल्या एका रहस्यमय स्फोटामुळे हादरून गेले.