ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

मूळ पगारात ६५०० रुपयांची वाढ


एसटीच्या संपामुळे दुसऱ्या दिवशी प्रवाशांचे झाले हाल


मुंबई : राज्यातील एसटी बस कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या कमिटीच्या बैठकीत यावर यशस्वी तोडगा काढण्यात आला आहे. त्यानुसार, एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात ६५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.


दरम्यान, ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे दुसऱ्या दिवशी प्रवाशांचे हाल झाले. सातवा वेतन आयोग लागू करा यासह विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे राज्यभरातील एसटी सेवा विस्कळीत झाली होती. आज दिवसभर सुमारे २२ कोटी रुपयांचा महसूल बुडाला होता. बुधवारी दिवसभरात ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील एसटीच्या २५१ पैकी ९४ आगार पुर्णतः बंद होते. ९२ आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. तर ६५ आगारामध्ये पुर्णतः वाहतूक सुरळीत सुरू होती.


गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस बाकी असताना एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे गाव गाठायचे कसे? कोकणात जाण्यासाठी रिझर्व्हेशन केलेल्या बसेसचं काय होणार? असे प्रश्न चाकरमान्यांना पडले होते.मात्र संपामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.


राज्यातील एसटी कामगारांनी दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपानंतर बुधवारी सह्याद्री अतिथी गृहावर एसटी कामगार संघटना आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली. या बैठकीत चर्चेअंती राज्य सरकारने कामगारांच्या मागण्या मान्य करत एसटी कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात साडे सहा हजाराची वाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे, एसटी कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दि. १ एप्रिल २०२० पासून सरसकट मुळ वेतनात ६५०० रुपये वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

Comments
Add Comment

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी