मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी माजी भारतीय विकेटकीपर अजय रात्रा यांना पाच सदस्यीय पॅनेलमध्ये सलिल ला यांच्या जागी पुरुष क्रिकेट संघाच्या निवडकर्तापदी नियुक्त केले आहे. परंपरेनुसार पाच निवडकर्ते विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात.
गेल्या वर्षी आगरकर यांची मुख्य निवड समितीचे प्रमुख म्हणून निवड केल्यानंतर निवड समितीमध्ये पश्चिम भागातून दोन निवडकर्ते सामील झाले. यात अंकोला आधीपासूनच या समितीचा भाग होते. यामुळे निवड पॅनेलच्या आत क्षेत्रीत प्रतिनिधित्व संतुलन कायम राखण्यासाठी एखाद्या सदस्याला बाहेर जाणे ठरलेलेच होते आणि बीसीसीआयने सलील अंकोला यांना निवड समितीतून हटवण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी पीटीआयला सांगितले, हा एक मोठा सन्मानही आहे आणि आव्हानही आहे. मी भारतीय क्रिकेटमध्ये योगदान देण्यास उत्सुक आहे. भारताला १९ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. दरम्यन अजर रात्रा ५ सप्टेंबरपासून पदभार सांभाळतील. ४२ वर्षीय रात्रा यांनी भारतासाठी ६ कसोटी, १२ वनडे सामने खेळले आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…