Jioचा ११ महिन्यांची व्हॅलिडिटी असलेला सर्वात स्वस्त प्लान

  196

मुंबई: जिओ ग्राहकांना नेहमीच रिचार्जचे विविध पर्याय उपलब्ध करून देत असते. तुम्हाला त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक पर्याय दिसतील. कंपनी स्वस्त, महाग असे अनेक रिचार्ज प्लान्स देत असते.


नुकतेच कंपनीने आपले सर्व प्लान्स रिवाईज केले. कंपनीने आपल्या व्हॅल्यू प्लान्सलाही रिव्हाईज केले. हे प्लान्स कमी किंमतीत चांगली व्हॅल्यू ऑफर करतात.


असाच एक प्लान १८९९ रूपयांचा आहे. हा प्लान कंपनीच्या पोर्टफोलिओचा सर्वात स्वस्त लाँग टर्म प्लान आहे. यात ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.


या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला कॉलिंग, डेटा आणि एसएमएस या तिघांचे फायदे मिळतात. दरम्यान, यात केवळ २४ जीबी डेटा मिळतो.


याशिवाय कंपनी अनलिमिटेड कॉलिंग आणि संपूर्ण व्हॅलिडिटीदरम्यान ३६०० एसएमएस ऑफर करते. या प्लानमध्ये अतिरिक्त फायदेही मिळतात.


युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळेल. यात तुम्हाला जिओ सिनेमा प्रिमियम आणि जिओ टीव्ही प्रिमियम याचा अॅक्सेस मिळणार नाही.


या प्लानमध्ये अनलिमिटेड ५जी डेटासोबत येत नाही. म्हणजेच तुम्हाला डेटा संपल्यानंतर अतिरिक्त डेटा बूस्टर रिचार्ज करावा लागेल.


जिओचा हा प्लान त्या लोकांसाठी चांगला आहे ज्यांना कमी किंमतीत अधिक दिवसांची व्हॅलिडिटी, कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते.

Comments
Add Comment

Gadchiroli Accident News : रस्त्यावर व्यायाम करत होते अन् भरधाव ट्रकनं चिरडलं; गडचिरोलीत ६ मुले ट्रकखाली, चौघांचा जागीच मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेतून सोडवणार

मुंबई : बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या आणि युनियनशी चर्चा करुन तोडगा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चालवणार १८ विशेष रेल्वेसेवा

रक्षाबंधनाच्या दिवशीही सुविधा मुंबई : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लांब

पाणंद रस्त्यांना अडथळा आणाल तर...

मुंबई : राज्यातील शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी एक समग्र आणि ठोस योजना सप्टेंबर महिन्याच्या

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी चांगला प्रतिसाद

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची ५ हजार २८५ घरे आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी आतापर्यंत ४० हजार ८२३ अर्ज दाखल झाले

पहिलीपासून विद्यार्थ्यांना एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा,