Jioचा ११ महिन्यांची व्हॅलिडिटी असलेला सर्वात स्वस्त प्लान

मुंबई: जिओ ग्राहकांना नेहमीच रिचार्जचे विविध पर्याय उपलब्ध करून देत असते. तुम्हाला त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक पर्याय दिसतील. कंपनी स्वस्त, महाग असे अनेक रिचार्ज प्लान्स देत असते.


नुकतेच कंपनीने आपले सर्व प्लान्स रिवाईज केले. कंपनीने आपल्या व्हॅल्यू प्लान्सलाही रिव्हाईज केले. हे प्लान्स कमी किंमतीत चांगली व्हॅल्यू ऑफर करतात.


असाच एक प्लान १८९९ रूपयांचा आहे. हा प्लान कंपनीच्या पोर्टफोलिओचा सर्वात स्वस्त लाँग टर्म प्लान आहे. यात ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.


या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला कॉलिंग, डेटा आणि एसएमएस या तिघांचे फायदे मिळतात. दरम्यान, यात केवळ २४ जीबी डेटा मिळतो.


याशिवाय कंपनी अनलिमिटेड कॉलिंग आणि संपूर्ण व्हॅलिडिटीदरम्यान ३६०० एसएमएस ऑफर करते. या प्लानमध्ये अतिरिक्त फायदेही मिळतात.


युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळेल. यात तुम्हाला जिओ सिनेमा प्रिमियम आणि जिओ टीव्ही प्रिमियम याचा अॅक्सेस मिळणार नाही.


या प्लानमध्ये अनलिमिटेड ५जी डेटासोबत येत नाही. म्हणजेच तुम्हाला डेटा संपल्यानंतर अतिरिक्त डेटा बूस्टर रिचार्ज करावा लागेल.


जिओचा हा प्लान त्या लोकांसाठी चांगला आहे ज्यांना कमी किंमतीत अधिक दिवसांची व्हॅलिडिटी, कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते.

Comments
Add Comment

मुंबईकरांच्या सेवेत लवकरच येणार नविन मोनोरेल

मुंबई : मुंबईतील मोनोरेल, अनेक दिवसांपासून वारंवार बिघाड होत असल्याने अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे .

सुझुकीने दुचाकीच्या किमती केल्या कमी; २२ सप्टेंबरपासून नवीन दर लागू

मुंबई : जीएसटी २.० सुधारणांचे संपूर्ण फायदे ग्राहकांना देईल, अशी घोषणा सुझुकी मोटरसायकल इंडियाने केली आहे.

‘आयफोन १७’च्या लाँचवेळी बीकेसी ॲपल स्टोअरमध्ये गोंधळ

मुंबई: बीकेसी 'जिओ सेंटर'मध्ये ॲपलच्या 'आयफोन १७' मालिकेच्या लाँचवेळी खराब गर्दी व्यवस्थापनामुळे शुक्रवारी

मुंबई अहमदाबाद महामार्गाबाबत मोठा निर्णय

मुंबई : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावर दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी २

Bombay High Court Bomb threat : मुंबई हायकोर्टाला पुन्हा बॉम्बची धमकी! पोलिस अलर्ट मोडवर

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा दहशतीचं सावट पसरलं आहे. उच्च न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी आल्याची माहिती समोर आली

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सात जणांना उच्च न्यायालयाची नोटीस

मुंबई : मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी सात जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. एनआयए