ST Worker Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्र्यांची बैठक; सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष!

Share

मुंबई : गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग असते. मात्र अशातच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे (ST Worker Strike) हत्यार उपसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे त्याचबरोबर २०१६ पासूनच्या थकीत महागाई भत्ता, घर भाडे भत्ता नक्कीच, व वार्षिक वेतन वाढ करावी अशा प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची (Eknath Shinde) कामगार संघटनेसोबत बैठक घेतली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. मंत्री उदय सामंत यांच्याकडून एसटी कामगार संघटनेला चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांची ही बैठक होणार असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ होऊ शकते किंवा भत्त्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते, अशी शक्यया वर्तवली जात आहे.

कर्मचारी काय म्हणाले?

एसटी कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची ७ ऑागस्ट रोजी बैठक झाली होती. त्याच बैठकीत २० ऑगस्ट रोजी बैठकीच्या आयोजनाचे पत्र देण्यात आले होते. मात्र २० तारीख देऊनही बैठक झाली नाही त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका धारण केली. “प्रत्येक वेळी आमची फसवणूक केली जाते, हे कर्मचाऱ्यांना माहिती आहे. एसटी कर्मचाऱ्यांना मुलंबाळं नाहीत का? मी प्रवाशांची माफी मागतो, तुमचे हाल होत आहेत. पण तुम्ही थोडं आमची बाजू बघा, आम्हाला कोण बघणार? मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही का रस्त्यावर उतरलो असतो?” अशी प्रतिक्रिया संघटनेचे संदीप शिंदे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आज दुपारी प्रशासनाने एसटी संघटनांना बैठकीसाठी बोलावले आहे. परंतु एसटी संघटना या बैठकीला जाणार का नाही? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. तसेच बैठक झाल्यास या बैठकीत सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

6 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

26 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

58 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

2 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago