‘मुंबईची सातही धरणं काठोकाठ’

  89

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली


मुंबई : सध्या धरणक्षेत्रात सतत रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे. सात धरणांपैकी विहार आणि तुळशी तलाव १०० टक्के भरले आहेत. तर अन्य धरणे ९५ टक्केपेक्षा जास्त भरली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात पुन्हा वाढ झाल्याचे महानगर पालिकेने नुकत्याच दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.


मुंबई शहर आणि उपनगरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने जोर पकडला आहे. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातही विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांमधील पाणीसाठ्यात पुन्हा वाढ झाली आहे.


आतापर्यंत सातही धरणांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे २० जुलैला तुळशी तलाव आणि २४ जुलैला तानसा तलाव भरला होता. २४ जुलैच्या मध्यरात्री विहार धरण, तर मोडक सागर धरणही याच दिवशी ओसंडून वाहू लागले. धरणे भरू लागल्याने मुंबई महापालिकेने १० टक्के पाणीकपात २९ जुलैपासून मागे घेतली होती. तर ठाणे शहर, भिवंडी आणि नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतींनाही मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील कपात मागे घेतली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. आता हीच क्षमता १४ लाख २ हजार ९९९ दशलक्ष लिटर एवढी झाली असून ९७ टक्के धरणे भरली आहेत २०२३ मध्ये याच कालावधीत ९० टक्के धरणे भरली होती.


तर २०२२ मध्ये ९८ टक्के पाणीसाठा होता. १ जुलै ते २५ जुलै या कालावधीत सात धरणातील पाणीसाठ्यात ६१ टक्क्यांनी वाढ झाली होती. ५ ऑगस्टनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने या धरणातील पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नव्हती. त्यामुळे ९३ टक्के पाणीसाठा होता. मात्र गेल्या काही दिवसांत पुन्हा पाऊस आल्याने हा साठा ९७ टक्के पोहोचला आहे त्यामुळे मुंबईकरांच्या वाट्याला पाणी हे योग्यप्रमाणात येईल.



मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा


अप्पर वैतरणा - ९७.४८ टक्के

मोडक सागर - ९८.९९ टक्के

तानसा - ९८.३७ टक्के

मध्य वैतरणा - ९८.६६ टक्के

भातसा - ९५.८७ टक्के

विहार - १०० टक्के

तुलसी - १०० टक्के
Comments
Add Comment

Ganesh Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी BMC चे मुंबईकरांना आवाहन

महापालिका प्रशासनाच्यावतीने नागरिकांना भरती व ओहोटीदरम्यान सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई : येत्या शनिवारी ६

दादर परिसरातील कबुतरांचे अन्यत्र स्थलांतर!

सोलो इमारत, पिंपळाच्या झाडांवरील वास्तव्य कमी लोकांच्या अंगावर होणारा विष्ठेचा अभिषेकही थांबला मुंबई :

सिक्रेट लॉकचा पर्दाफाश; हायवेलगतच्या टार्जन डान्सबारवर पोलिसांची धडक कारवाई, ५ बारबालांची सुटका

मुंबई : पनवेलसह मुंबईत डान्सबार सर्रास सुरू असल्याची अनेकदा प्रकरणं समोर आली आहेत. काही महिन्यांपूर्वी तर थेट

Mumbai High Court: बाणगंगेत गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन नाही, मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

मुंबई: बाणगंगा तलावात पर्यावरणपूरक मूर्तींचे विसर्जन करू देण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

जीएसटी स्लॅब बदलांमुळे दिलासा : एकनाथ शिंदे

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) रचनेतील ताज्या बदलांना

भुजबळांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील बहिष्कारावर मुख्यमंत्र्यांचं सर्वात मोठं विधान

"जोपर्यंत हे राज्य आहे, तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही.":  मुख्यमंत्री मुंबई: