Giriraj Singh : हे लोक भारताचा पाकिस्तान, बांगलादेश बनवतील

Share

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची इंडी आघाडीवर घणाघाती टीका

बेगुसराय : तेजस्वी यादव, अखिलेश यादव आणि राहुल गांधी हे मुस्लिम व्होट बँकेचे ठेकेदार आहेत. त्यांचे सरकार सत्तेवर आल्यास ते बिहार आणि उत्तर प्रदेशात शुक्रवारची सुट्टी जाहीर करतील. देशात राहुल गांधी, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांचे सरकार स्थापन झाले तर हे लोक भारताचे पाकिस्तान आणि बांगलादेशात रूपांतर करतील, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी केले. ते बेगुसराय येथे पत्रकारांशी बोलत होते.

आसाममध्ये दर शुक्रवारी दिली जाणारी दोन तासांची सुटी रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. यापूर्वी आसाममध्ये शुक्रवारी सरकारी कर्मचाऱ्यांना २ तास सुटी मिळत असे. ही सुटी सरकारने बंद केली. यासंदर्भात प्रतिक्रीया देताना गिरीराज सिंह म्हणाले की, मंगळवारी मारुतीची पूजा, सोमवारी महादेवाची किंवा इतर दिवशी इतर देवी-देवतांची पूजा केली जात असेल, तर त्याला सुट्टी द्यावी, असे आजपर्यंत कोणत्याही हिंदूने म्हटलेले नाही. पण व्होटबँकेचे राजकारण करणारे तेजस्वी यादव, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासारखे लोक मुस्लिमांचे रक्षणच करत नाहीत तर त्यांच्या शब्दाची अंमलबजावणीही करत आहेत. भारतात एकच देश आणि एकच कायदा चालेल, असे स्पष्ट शब्दात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले.

आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा आणि आसाम विधानसभेचे आभार मानताना ते म्हणाले की, आसाम सरकार एक देश एक कायदा लागू करत आहे आणि म्हणूनच त्यांचे आभार व्यक्त करत असल्याचे गिरीराज यांनी सांगितले.

Recent Posts

MI vs CSK Live Score, IPL 2025 :  रोहित-सूर्याचे वादळ, धोनीच्या चेन्नईवर मुंबईचा ९ विकेटनी विजय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…

35 minutes ago

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…

6 hours ago

Summer Food Alert : उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणारे ‘हे’ पदार्थ टाळा

मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…

7 hours ago

Health Tips: कडक उन्हामुळे चक्कर येत असेल तर हे पेय प्या!

तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…

7 hours ago

प्रसिद्ध डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी महिलेला पोलीस कोठडी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…

7 hours ago

Central Railway News : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; बदलापुरातील फलाट क्रमांक १ कायमस्वरूपी बंद!

बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…

8 hours ago