Giriraj Singh : हे लोक भारताचा पाकिस्तान, बांगलादेश बनवतील

  38

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची इंडी आघाडीवर घणाघाती टीका


बेगुसराय : तेजस्वी यादव, अखिलेश यादव आणि राहुल गांधी हे मुस्लिम व्होट बँकेचे ठेकेदार आहेत. त्यांचे सरकार सत्तेवर आल्यास ते बिहार आणि उत्तर प्रदेशात शुक्रवारची सुट्टी जाहीर करतील. देशात राहुल गांधी, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांचे सरकार स्थापन झाले तर हे लोक भारताचे पाकिस्तान आणि बांगलादेशात रूपांतर करतील, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी केले. ते बेगुसराय येथे पत्रकारांशी बोलत होते.


आसाममध्ये दर शुक्रवारी दिली जाणारी दोन तासांची सुटी रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. यापूर्वी आसाममध्ये शुक्रवारी सरकारी कर्मचाऱ्यांना २ तास सुटी मिळत असे. ही सुटी सरकारने बंद केली. यासंदर्भात प्रतिक्रीया देताना गिरीराज सिंह म्हणाले की, मंगळवारी मारुतीची पूजा, सोमवारी महादेवाची किंवा इतर दिवशी इतर देवी-देवतांची पूजा केली जात असेल, तर त्याला सुट्टी द्यावी, असे आजपर्यंत कोणत्याही हिंदूने म्हटलेले नाही. पण व्होटबँकेचे राजकारण करणारे तेजस्वी यादव, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासारखे लोक मुस्लिमांचे रक्षणच करत नाहीत तर त्यांच्या शब्दाची अंमलबजावणीही करत आहेत. भारतात एकच देश आणि एकच कायदा चालेल, असे स्पष्ट शब्दात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले.


आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा आणि आसाम विधानसभेचे आभार मानताना ते म्हणाले की, आसाम सरकार एक देश एक कायदा लागू करत आहे आणि म्हणूनच त्यांचे आभार व्यक्त करत असल्याचे गिरीराज यांनी सांगितले.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )