रेशनवरील मोफत तांदूळ आता होणार कायमचा बंद

त्याऐवजी मिळणार आता ९ जीवनावश्यक वस्तू


नवी दिल्ली : केंद्र सरकार देशातील गरजूंना रेशनकार्डद्वारे मोफत रेशन देते. यामध्ये शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ दिला जातो, मात्र त्यात मोठा बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मोफत तांदूळ देण्याऐवजी आता इतर ९ वस्तू देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.


केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत. रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशनही पुरविले जाते. मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास ९० कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार रेशनवरील मोफत तांदूळ बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी इतर ९ जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत. यामध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल, अशी सरकारला आशा आहे.


शिधापत्रिकेसाठी अर्ज कसा करावा


तुमच्याकडे अद्याप शिधापत्रिका नसेल, परंतु तुम्ही त्यासाठी पात्र असाल, तर तुम्ही ते जारी करण्यासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावे लागेल. तुम्ही या विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करू शकता. अर्ज भरताना, सर्व आवश्यक माहिती बरोबर असल्याची खात्री करा. फॉर्ममध्ये मागितलेली संबंधित कागदपत्रेही तुम्हाला जोडावी लागतील. तुमचा फॉर्म आणि कागदपत्रे तयार झाल्यानंतर, तुमच्या जवळच्या रेशनिंग कार्यालयात जमा करा.

Comments
Add Comment

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या