गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, घरामध्ये अडकले लोक, पाणी नाही- वीज नाही

  52

गांधीनगर: गुजरताच्या सौराष्ट्रपासून ते कच्छ पर्यंत निसर्गाचा कहर सुरू आहे. वडोदरापासून ते राजकोट पर्यंत जामनगर पासून ते खेडा पर्यंत बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. वडोदराच्या सयाजीगंज परिसरात ८ फुटापर्यंत पाणी भरले आहे. लोक दोन दिवसांपासून घरात अडकले आहेत. पाणीही नाही आहे आणि वीजही नाही आहे.


अशातच सैन्याचे जवान देवदूत बनून मदतीसाठी येत आहेत. दोरी आणि बादलीच्या मदतीने प्रत्येक घरात पाणी आणि जेवण पोहोचवले जात आहे. गुजारतमधील गंभीर स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी संपर्कात आहेत. पंतप्रधान मोदींनी फोनवरून विश्वास दिला की केंद्र सरकार हरतऱ्हेची मदत करण्यास तयार आहे.


गुजरातमध्ये चार दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण पावसामुळे हाहाकार माजला आहे. आज अरबी समुद्रात चक्रीवादळ थैमान घालू शकते. यामुळे हवामान विभागाने ओडिशा केरळमध्येही मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. गेल्या ८० वर्षात हे पहिलेच वादळ आहे जे जमिनीवर निर्माण झाले आहे. दरम्यान गेल्या तीन दिवसांत गुजरातमध्ये पावसामुळे ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Comments
Add Comment

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व