“एक पेड मा के नाम": कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे २९ ऑगस्टला राबवली जाणार मोहीम

जव्हार(प्रतिनिधी) - भारताच्या माननीय पंतप्रधानांनी ५ जून २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आईच्या नावाने “एक पेड मा के नाम ग्लोबल कॅम्पेन सुरू केले आहे . जागतिक अभियानाचा एक भाग म्हणून, सप्टेंबर २०२४ पर्यंत देशभरात ८० कोटी रोपे आणि मार्च २०२५ पर्यंत १४० कोटी रोपे लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने दिली. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने असोला भाटी वन्यजीव अभयारण्यात २० जून २०२४ रोजी वृक्षारोपणाचा उपक्रम सुरू केला, ज्यामध्ये व्यक्तींनी त्यांच्या आईच्या सन्मानार्थ वृक्षारोपण केले.


या मोहिमेचा एक भाग म्हणून कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे २९ ऑगस्ट रोजी मोहीम राबविण्यात येत आहे . भारत सरकारच्या माननीय कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमांतर्गत, मंत्रालय आयएआरआय कॅम्पसमध्ये सुमारे १ एकर जागेत "मातृ वन" स्थापित करेल. जिथे माननीय कृषिमंत्री आणि मंत्रालयाचे अधिकारी / कर्मचारी रोपे लावतील. वृक्षारोपण कार्यक्रम २९ ऑगस्ट २०२४ सकाळी १०:००वाजता आयएआरआय कॅम्पस, पूसा, नवी दिल्ली येथे सुरू होईल. देशातील डीए अँड एफडब्ल्यू, आयसीएआर संस्था, सीएयू, केव्हीके आणि एसएयूच्या सर्व अधिनस्थ कार्यालयांना देखील त्याच दिवशी आणि वेळेत आपापल्या ठिकाणी समान वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित करण्यास सूचित केले आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत ८०० हून अधिक संस्था सहभागी होणार असून या कार्यक्रमात ३००० ते ४००० रोपांची लागवड केली जाणार आहे.


'एक पेड मा के नाम ' अभियान ही एक जनचळवळ असून लोक वृक्षारोपण करून आपल्या मातेला आणि पृथ्वीमातेला मानवंदना देत सहभागी होत आहेत. वृक्षारोपणामुळे सरकारने सुरू केलेले उद्दिष्ट देखील पूर्ण होते जे पर्यावरणपूरक जीवनशैलीची एक लोकचळवळ आहे. शेतीमध्ये शाश्वत शेती साध्य करण्यासाठी वृक्षलागवड हे महत्त्वाचे पाऊल आहे. माती, पाण्याची गुणवत्ता सुधारून आणि जैवविविधता वाढवून शेतीची उत्पादकता वाढविण्यास झाडे मदत करतात. लाकूड व बिगर लाकूड उत्पादनातून ही झाडे अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देतात. या अभियानात जमिनीचा ऱ्हास आणि वाळवंटीकरण रोखण्याची आणि ती बदलण्याची भरपूर क्षमता आहे.

Comments
Add Comment

Jalgaon: प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाला विवस्त्र करुन काढली धिंड; जळगावमधील क्रूर घटना

जळगाव: प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाला नग्न करून बेदम मारहाण करून त्याची गावभर

LPG Cylinder: गॅस सिलिंडर बुक होत नसेल तर कुठे तक्रार कराल? 'या' हेल्पलाईन नंबरवर तात्काळ मिळेल मदत

मुंबई: मागील काही दिवसांपासून अनेक लोकांना एलपीजी सिलिंडर बुक करताना काही समस्यांना सामोरं जावं लागत आहे.

हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायासाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासा; गॅस टंचाईवर सरकारचा तोडगा पण...

मुंबई: हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायासाठी केंद्र सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या

Yavatmal Bus Fire : यवतमाळ-भारी विमानतळ मार्गावर मिनी ट्रॅव्हल्स जळून खाक; जळत्या ट्रॅव्हल्समधून...

यवतमाळ : वर्धा येथून नांदेडच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका मिनी ट्रॅव्हल्सला यवतमाळ शहराजवळील भारी

दीर्घ काळापासून प्रलंबित शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा

-‘पवित्र’ पोर्टलद्वारेच होणार नियुक्त्या; खासगी संस्थांना ‘रोस्टर’चे बंधन, राज्यातील हजारो उमेदवारांना

पुण्यात ईदनिमित्त वाहतुकीत बदल; लष्कर परिसरातील काही रस्ते बंद

पुणे : रमजान ईदनिमित्त लष्कर भागातील इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर