Government Job : सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी; ८वी ते १२वी पास उमेदवार करु शकतात अर्ज!

जाणून घ्या सविस्तर माहिती


मुंबई : सध्या अनेक युवक सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असतात. मात्र शिक्षण कमी असल्यामुळे त्यांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न अपुरे राहते. अशाच तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मेगाभरती जारी केली आहे. ज्यामध्ये ८वी ते १२वी पास उमेदवार देखील अर्ज करु शकणार आहेत. पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट आणि चंदीगड हायकोर्टमध्ये ही भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०२४ असणार आहे.


सर्वोच्च न्यायालयात ३०० पदांसाठी भरती केली जाणार आहे. उमेदवारांना https://highcourtchd.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. पात्र उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि फिजिकल टेस्टद्वारे होणार आहे.



वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क


या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असावे. या नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवाराला ७०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी/ एसटी उमेदवाराला ६०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे