Government Job : सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी; ८वी ते १२वी पास उमेदवार करु शकतात अर्ज!

जाणून घ्या सविस्तर माहिती


मुंबई : सध्या अनेक युवक सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असतात. मात्र शिक्षण कमी असल्यामुळे त्यांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न अपुरे राहते. अशाच तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मेगाभरती जारी केली आहे. ज्यामध्ये ८वी ते १२वी पास उमेदवार देखील अर्ज करु शकणार आहेत. पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट आणि चंदीगड हायकोर्टमध्ये ही भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०२४ असणार आहे.


सर्वोच्च न्यायालयात ३०० पदांसाठी भरती केली जाणार आहे. उमेदवारांना https://highcourtchd.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. पात्र उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि फिजिकल टेस्टद्वारे होणार आहे.



वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क


या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असावे. या नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवाराला ७०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी/ एसटी उमेदवाराला ६०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही