CIDCO Lottery : नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! सिडको काढणार घरांची सोडत

नवी मुंबई : काही दिवसांपूर्वीच म्हाडाने मुंबईत २०३० घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. त्यामुळे मुंबईत हक्काचे घर घेणाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. त्यानंतर आता नवी मुंबईतही (Navi Mumbai) घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळत आहे. सिडकोकडून ९०२ घरांसाठी सोडत केली (CIDCO Lottery) जाणार आहे. सिडकोची ही घरे कळंबोली, खारघर आणि घणसोली या भागात असून उमेदवार आजपासून अर्ज करू शकणार आहेत.


सिडकोची ही घरे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, खुला प्रवर्ग, मध्यम उत्पन्न गटांसाठी असतील. कळंबोली, खारघर आणि घणसोली येथे एकूण २१३ घरे आहेत. यापैकी १७५ सर्वसामान्य प्रवर्गासाठी तर ३८ घरे आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी आहेत. तसेच सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलांतील ६८९ घरांपैकी १२८ घरे मध्यम उत्पन्न गटासाठी आणि ४२ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. याशिवाय ३५९ घरे अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.



बामणडोंगरी परिसरात १०० दुकानांची सोडत


सिडकोने घरांसह बामणडोंगरी स्थानक परिसरातील गृहसंकुलातील १०० दुकानांच्या विक्रीसाठी देखील योजना जाहीर केली आहे. यासाठी येत्या ३० ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. दरम्यान, उलवे नोडमध्ये सिडकोने अत्यंत उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. त्याचबरोबर या दुकानांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प नजीक असल्यामुळे या परिसराला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त होणार आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.