काय होईल जर एक महिना तुम्ही सकाळचा नाश्ता केला नाही तर?

मुंबई: असं म्हणतात की दिवसाची सुरूवात चांगली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. आजच्या धावपळीच्या युगात दिवसाच्या सुरूवातीला केला जाणारा ब्रेकफास्ट आपण करत नाही. मात्र ही रोजची सवय बरी नाही. कारण या सवयीमुळे शरीरात पोषकतत्वांची कमतरता येऊ शकते. हळू हळू आपले शरीर आजारांचे घर बनते.


तज्ञांच्या मते सकाळचा नाश्ता केल्याने तुमच्या शरीराला ग्लुकोज मिळते. यामुळे ब्लड शुगर लेव्हल मेंटेन करण्यास मदत होते. तर सकाळचा नाश्ता केला नाही तर शरीरात ब्लड शुगर लेव्हल कमी होते. यामुळे टाईप २ डायबिटीजचा धोका वाढतो.


जर सलग १ महिना तुम्ही सकाळचा नाश्ता केला नाही तर काय होईल घ्या जाणून



चिडचिडेपणा


तज्ञांच्या मते न्यूरोट्रान्समीटर सेरोटोनिन आपला मूड चांगला करण्यास मदत करते. या हार्मोनवर नाश्ता केल्यास चांगला परिणाम होतो. जर आपण एक महिना सकाळची न्याहारी घेतली नाही तर यामुळे चिडचिडेपणा, चिंता तसेच डिप्रेशनची लक्षणेही वाढतात.



वजन वाढणे


सकाळचा नाश्ता जर तुम्ही केला तर वजन कमी होण्याऐवजी ते वाढण्याचा धोका असतो. जेव्हा आपण ब्रेकफास्ट करत नाही तेव्हा आपण लंचमध्ये अधिक खातो. यामुळे वजन वाढू शकते.



मेटाबॉलिक सिंड्रोम


नाश्ता न केल्यास मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका वाढतो. यामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि टाईप २ डायबिटीजचा धोका वाढतो.



टाईप २ डायबिटीज


तज्ञांच्या मते नाश्ता न केल्याने टाईप २ डायबिटीजचा धोका वाढतो. नाश्ता न केल्यास शरीरात ब्लड शुगर कंट्रोल राहत नाही यामुळे डायबिटीजचा धोका वाढतो.



पोषकत्तवांची कमतरता


सकाळचा नाश्ता न केल्यास आवश्यक पोषकतत्वे मिळत नाहीत. जर आपण सकाळचा नाश्ता केला नाही तर आपल्या शरीरात व्हिटामिन, खनिजे, फायबरसारखी पोषकतत्वांची कमतरता होऊ शकते.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे