Gokulashtami 2024 : गोकुळाष्टमीसाठी मुंबई पोलीस सज्ज; प्रतिबंधात्मक आदेश जारी!

काय आहेत पोलिसांचे आदेश?


मुंबई : श्रावण महिना सुरु होताच अनेक सणांची रांग लागते. नुकतेच नागपंचमी, श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर आता सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोकुळाष्टमीचे (Gokulashtami 2024) वेध लागले आहेत. हिंदू धर्मात कृष्णजन्माष्टमीला सर्वात जास्त महत्व आहे. कारण या दिवशी श्रीविष्णूंचा आठवा अवतार श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळे राज्यभरात दहीहंडी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. विशेषत: याकाळात मुंबईत दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामुळे गोपाळकालाच्या दोन आठवडा आधीपासूनच दहिहंडीची तयारी करण्यासाठी युवक सज्ज होतात. यंदा २६ ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी साजरी केली जाणार असून या उत्सवाच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीसही (Mumbai Police) सज्ज झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळाष्टमीनिमित्त मुंबई पोलिसांनी मार्गदर्शक नियमावली आणि आदेश जारी केले आहेत. मुंबई पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी यासंदर्भातील परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, पादचाऱ्यांवर पाणी ओतणे, पाण्याचे फुगे मारणे तसेच गुलाल उधळण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिकरित्या अश्लील शब्दांचा उच्चार करणे, घोषणाबाजी करणे तसेच अश्लील गाणी गाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. २६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून २७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत आदेश लागू होणार आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई होणार आहे.



कशावर घालण्यात आले निर्बंध?



  • सार्वजनिकरित्या अश्लील शब्दांचे उच्चार किंवा घोषणा किंवा अश्लील गाणी गाणे.

  • हातवारे किवा नक्कल प्रस्तुतीकरणांचा वापर आणि तयार प्रतिमा, चिन्हे, फलक, किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचे प्रदर्शन किंवा प्रसार करणे ज्यामुळे प्रतिष्ठा, शालीनता किंवा नैतिकता दुखावते.

  • पादचाऱ्यांवर रंगीत पाणी किंवा फवारे, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे.

  • रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे तयार करणे किंवा फेकणे.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील