Saurabh Katiyar : लाडकी बहीण योजनेंतर्गत मिळणारा निधी बँकांनी कपात करु नये!

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची घोषणा


अमरावती : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mazi Ladki Bahin Yojana) ही महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी योजना असून या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रतिमाह दीड हजार रुपये देण्यात येतात. जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झालेले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात जो निधी जमा झालेला आहे तो निधी कोणत्याही बँकेने कपात करु नये, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार (Saurabh Katiyar) यांनी दिली आहे.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सध्या राज्यात लोकप्रिय योजना म्हणून परिचित असून या योजनेंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यात राज्यस्तरावरुन प्रतिमाह दीड हजार रुपये याप्रमाणे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत. त्याचबरोबर यापुढेही या योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात प्रतिमाह दीड हजार रुपये रक्कम जमा होईल. परंतु असे निदर्शनास आले आहे की, काही बँका महिलांकडे असलेल्या इतर कर्जांची हप्ते या रकमेतून कपात करीत आहेत. अशा तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त होत आहेत. त्यामुळे कोणत्याही बँकेने लाडकी बहिण योजनेंतर्गत मिळणाऱ्या निधीतून इतर रकमा कपात करुन नये, अशा प्रकारची कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित बँकेविरुध्द कार्यवाही करण्यात येईल याची सर्व बँकांनी नोंद घ्यावी.


त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना अद्यापही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत निधी मिळाला नाही त्यांनी आपल्या खाते आधार लिंक करुन घ्यावेत. त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या खात्यात निधी जमा होईल. तसेच ज्या पात्र लाभार्थ्यांनी अद्यापही नोंदणी केली नाही त्या लाभार्थ्यांनीही लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांशी संपर्क करुन आपली नोंदणी करावी. जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, असे आवाहन कटियार यांनी केले आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे