म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी आता ५० टक्के प्रतीक्षा यादी

यंदा १० घरामागे प्रतीक्षा यादीत पाच विजेते जाहीर करणार


मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सप्टेंबर २०२४ मध्ये काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी अखेर प्रतीक्षा यादीत वाढ करण्यात आली आहे. प्रतीक्षा यादी ५० टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा १० घरामागे प्रतीक्षा यादीत पाच विजेते जाहीर करण्यात येणार आहेत. मागील वर्षी १० घरामागे एक अशी प्रतीक्षा यादी होती.


म्हाडाच्या सोडत प्रक्रियेत बदल करून आता सोडतीआधीच पात्रता निश्चिती करण्यात येत आहे. त्यामुळे सोडतीनंतर घराचे वितरण करताना मोठ्या संख्येने विजेते अपात्र ठरण्याचा मुद्दा उरत नसल्याचे स्पष्ट करीत प्रतीक्षा यादी रद्द करण्याचा विचार पुढे आला होता. त्यातच प्रतीक्षा यादीवरील घरांच्या वितरणातच सर्वाधिक भ्रष्टाचार होतो असा आरोप करीत प्रतीक्षा यादी रद्द करण्याची मागणी होत होती. मात्र सोडतीआधी पात्र ठरलेले विजेते कोणत्याही कारणाने घरे नाकारू शकतात. त्यामुळे त्या घरांच्या जागी इतरांना संधी मिळावी म्हणून प्रतीक्षा यादी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रतीक्षा यादी कमी करण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २०२३ च्या सोडतीत केवळ १० टक्के प्रतीक्षा यादी ठेवण्यात आली होती. म्हणजेच १० घरामागे प्रतीक्षा यादीवरील एक विजेता असे त्याचे स्वरुप होते.


मागील सोडतीत प्रतीक्षा यादी कमी असल्याने सामाजिक आरक्षणातील आणि इतर राखीव प्रवर्गातील काही घरे विकली गेली नाहीत. या घरांसाठी मोठ्या संख्येने अर्जदार होते. मात्र प्रतीक्षा यादी कमी असल्याने त्यांनाही घरे मिळू शकली नाहीत. घरे विकली न गेल्याने म्हाडालाही त्याचा फटका बसला. या पार्श्वभूमीवर १३ सप्टेंबर २०२४ च्या सोडतीसाठी प्रतीक्षा यादी १० टक्क्यांवरून ५० टक्के करण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे यंदा १० घरामागे प्रतीक्षा यादीत ५ विजेते जाहीर केले जाणार आहेत. गेल्या वर्षी १० घरामागे प्रतीक्षा यादीवरील एक विजेता जाहीर करण्यात आला होता. प्रतीक्षा यादीतील विजेत्यांची संख्या वाढविल्यामुळे घरे विक्रीविना रिक्त रहाण्याचे प्रमाण कमी असेल, असा दावा मंडळाकडून करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या