Nitesh Rane : महाविकास आघाडी नेत्यांचे घाणेरडे राजकारण; त्यांना सत्तेशिवाय काहीच दिसत नाही!

न्यायालयावर खुर्ची लावून संजय राऊत सारख्या माकडाला बसवा


आमदार नितेश राणे यांचा विरोधकांवर हल्लाबोल


मुंबई : बदलापुरमध्ये (Badlapur Crime) काल जो काही विकृत प्रकार झाल्यानंतर राज्यातील सर्व प्रतिनिधी सरकार काल अ‍ॅक्शन मोडवर गेला आहे. महायुती (Mahayuti) सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अ‍ॅक्शन घ्यायला सुरु केली. यातच एकीकडे एसआयटी स्थापन झाली आहे आणि सरकार म्हणून सगळ्यांच एकस्पष्ट मत आहे की, कुठल्याही परिस्थितीमध्ये बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. फाशीच्या शिवाय दुसरी कोणताही पर्याय असता कामा नये, ही भूमिका मांडली आहे. मात्र तरीही महाविकास आघाडीमधील मालक आणि त्यांचे चेले अत्याचार प्रकरणाबाबत त्यांचे घाणेरडे राजकारण दाखवत आहेत, असा घणाघात आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला.


काल बदलापूरमध्ये झालेल्या जनक्षोभानंतर राज्यसरकार अ‍ॅक्शन मोडवर गेला आहे. त्याप्रमाणे कारवाई देखील सुरु झाली आहे. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) आणि सुप्रिया सुळे यांना सत्तेशिवाय काही येत नाही. महायुती सरकारचे विरोधक इतक्या खालच्या दर्जाचे असतील, याची कोणालाही अपेक्षा नाही. कारण कोलकातामध्ये झालेल्या हत्याकांड तसेच बांग्लादेशमधील हिंदूंबद्दल झालेल्या हिंसाचाराबाबत महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यांनी आपले वक्त्व्य मांडले नाही. परंतु काल बदलापूर प्रकरणाबाबत यांनी मांडलेले त्यांचे वकत्तव्य हे फक्त घाणेरडे राजकारण होते. त्यांनी केलेले वकत्व्य हे कोणत्याही माताभगिनी किंवा महाराष्ट्रासाठी नसून केवळ सत्तेसाठी होते. त्यांना 'सत्ता एके सत्ता' याशिवाय त्यालोकांना काहीही दिसत नाही, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.



संजय राऊतने 'लाडकी डॉक्टर योजना' राबवावी


त्याचबरोबर, महाविकास आघाडीचे सरकार असताना महिला किती सुरक्षित होत्या याचा पाढा वाचावा लागेल, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतने बोलूच नये. उद्धव ठाकरेच्या घरामध्येच एक बलात्कारीचा आरोपी आहे, जो त्याच्यासोबत मातोश्रीमध्ये राहतो. तर संजय राजाराम राऊत याने आता 'लाडकी डॉक्टर योजना' राबवली पाहिजे. कारण एका डॉक्टर महिलेचा कसा छळ होतो, हे तिने सातत्याने पोलिसांना सांगितलेले आहे. त्यामुळे यांची माताभगिनींबद्दल बोलण्याची लायकी नाही, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली. तसेच महायुती सरकार या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही. त्यांना फाशीवर चढवल्याशिवाय गप्प बसणार नाही, ही स्पष्ट भूमिका नितेश राणे यांनी मांडली.



संजय राऊत शेंबड्यासारखे बडबडू नकोस


ज्या शाळेत ही घटना घडली ती भाजपाच्या संबंधित आहे. तसेच जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा न्यायालय दखल घेतात परंतु अशा घटनेनंतर न्यायालयाने का दखल घेतली नाही, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. त्यावर नितेश राणे यांनी चोख उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, 'भाजपाच्या संबधित जरी ही घटना घडली असेल तरीही आम्ही कारवाई करण्याचे थांबलो नाही. तुझ्या नालायक मालकासारखे आम्ही सरकार चालवत नाही. जो कोणी आरोपी होता, ज्या संस्थेमध्ये हे घडले आणि अशी घटना कधीही आपल्या संस्थेत घडू नये असे प्रत्येक संस्थेला वाटते. म्हणून भाजपाच्या संबंधित ही संस्था असली तरीही कारवाई होत आहेच. म्हणून उगाच शेंबड्यासारखे बडबडत राहू नकोस, असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतला फटकारले.


तसेच न्यायालयालाही मार्गदर्शन करण्याइतका तू दीड शहाणा झाला आहे. तर आता न्यायालयावर अजून एक खुर्ची लावून संजय राजाराम राऊत सारख्या माकडाला बसवा, असे म्हणत नितेश राणे यांनी डिवचले.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी