Mumbai Crime : मुंबईतील खारदांडा परिसरात दोन अल्पवयीन मुलींना छेडण्याचा प्रयत्न!

आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात


मुंबई : सध्या देशभरातून बदलापूर (Badlapur Crime) अत्याचार प्रकरणाबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बदलापूरची ही घटना ताजी असताना आता मुंबईतही (Mumbai) अशीच एक घटना आजीच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात टळली. मुंबईतील खारदांडा परिसरात एका नराधमाने दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान पोलीस याबाबत अधिक तपास करत असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अमन सिंग हा दोन्ही अल्पवयीन मुलींच्या घराशेजारी राहत आहे. तर अल्पवयीन मुलींमधील एक मुलगी १२ तर दुसरी ६ वर्षांची आहे. या नराधमाने काल सहा वर्षीय मुलीला चिडवत व खेळायचे नाटक करत घरी घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी घरात असणाऱ्या मुलीच्या आजीने आरडा ओरड केल्यानंतर त्याला बाहेर काढले. परंतु यावेळी आरोपीने त्यांना धमकावले. तसेच मागील शनिवारी देखील बारा वर्षीय मुलीला खिडकीतून डोकावत इशारे केले होते. परंतु त्यावेळी आरोपीच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले. पण सातत्याने त्याचे असे वागणे पाहून अल्पवयीन मुलींच्या आईवडिलांनी खार पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली.


दरम्यान, खार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पॉस्को अंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ अमन सिंग या आरोपीला अटक केली. याप्रकरणी खार पोलीस अधिक तपास करत आहेत.


Comments
Add Comment

स्वतंत्र न राहता दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष येणार एकत्र

गट स्थापन करत आपला नेमणार गटनेता, विविध समित्यांमध्ये मिळवणार स्थान मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत

Dahisar Bhayandar Metro 9 Line Railway : दहिसर-भाईंदरकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो-९ ला 'ग्रीन सिग्नल', १० स्थानके, १३ किमी मार्गाचा रुट; फेब्रुवारीत धावणार पहिली ट्रेन

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत

महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुका: मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुन्हा एकदा पुढे,कधी आहेत?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुळीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात

मुख्यमंत्र्यांनी केली तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा; एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या

बारावी–दहावी परीक्षेआधी महाराष्ट्र बोर्डाचा निर्णय, नियम, मार्गदर्शन, प्रेरणा सर्व काही यूट्यूब चॅनेलवर

मुंबई : बारावी आणि दहावी परीक्षांच्या आधी, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थी, शाळा आणि परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांना

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या