Mahavikas Aghadi : सांगलीवरुन पुन्हा एकदा ठाकरे गट-काँग्रेसमध्ये उफाळून आला वाद!

'विशाल पाटील यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे', ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य


सांगली : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) वेळी सांगलीच्या (Sangali) जागेवरुन महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) चांगलीच बिघाडी झाल्याचे पाहायला मिळाले. मित्रपक्षांशी चर्चा न करता ठाकरे गटाने (Thackeray Group) या जागेवरुन थेट आपला उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली. यातूनच विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा विजय झाला. त्यामुळे ठाकरे गट तोंडावर आपटला शिवाय मविआवरही विपरित परिणाम झाला. यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे. लोकसभेला काँग्रेसने साथ न दिल्यामुळे आता विधानसभेला जिल्ह्यामध्ये काँग्रेसशी युती नकोच, अशी थेट मागणी सांगलीचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते (Sanjay Vibhute) यांनी केली आहे.


संजय विभुते यांनी काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांच्यावर थेट टीकास्त्र उपसले आहे. त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका विभुते यांनी केली आहे. तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पुन्हा विश्वासघात होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत, त्यामुळे सांगली जिल्ह्यात काँग्रेस सोबत आघाडी नको, अशी मागणी देखील संजय विभुते यांनी केली आहे. त्यांच्या मागणीमुळे आगामी काळात काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये जोरदार वाद रंगण्याची शक्यता आहे.


दरम्यान, खासदार विशाल पाटलांनी खानापूर-विटा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या निदर्शनास देखील विशाल पाटलांची भूमिका आणून देणार असल्याचे संजय विभुतेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सांगली विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस असा संघर्ष पुन्हा उफाळून येणार आहे.


Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध