निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद, हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये होणार निवडणुकीची घोषणा

नवी दिल्ली: निवडणूक आयोग आज चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करणार आहे. निवडणूक आयोग हरयाणा, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. याशिवाय निवडणूक आयोग झारखंड आणि महाराष्ट्रातही निवडणुकीच्या तारखांची घोषणा करू शकते.


निवडणूक आयोग आज दुपारी तीन वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. यात जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. याशिवाय आज हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखांचीही घोषणा केली जाऊ शकते. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदा विधानसभा निवडणुका होत आहेत. आयोगाने गेल्याच आठवड्यात जम्मू-काश्मीर आणि हरयाणाचा दौरा पूर्ण केला होता.



दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद


निवडणक आयोगाने दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. मात्र यावेळी कोणत्या राज्यांतील निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर करणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. हरयाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ तीन नोव्हेंबर आणि २६ नोव्हेंबरला समाप्त होत आहे. तसेच ३० सप्टेंबरआधी जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याची निवडणूक आयोगाची योजना आहे. ही मर्यादा सुप्रीम कोर्टाने ठरवली आहे.


आयोगाने निवडणूक संबंधीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नुकताच जम्मू-काश्मीर आणि हरयाणाचा दौरा केला होता मात्र त्यांनी महाराष्ट्राचा दौरा अद्याप केलेला नाही.
Comments
Add Comment

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे