निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद, हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये होणार निवडणुकीची घोषणा

नवी दिल्ली: निवडणूक आयोग आज चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करणार आहे. निवडणूक आयोग हरयाणा, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. याशिवाय निवडणूक आयोग झारखंड आणि महाराष्ट्रातही निवडणुकीच्या तारखांची घोषणा करू शकते.


निवडणूक आयोग आज दुपारी तीन वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. यात जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. याशिवाय आज हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखांचीही घोषणा केली जाऊ शकते. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदा विधानसभा निवडणुका होत आहेत. आयोगाने गेल्याच आठवड्यात जम्मू-काश्मीर आणि हरयाणाचा दौरा पूर्ण केला होता.



दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद


निवडणक आयोगाने दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. मात्र यावेळी कोणत्या राज्यांतील निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर करणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. हरयाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ तीन नोव्हेंबर आणि २६ नोव्हेंबरला समाप्त होत आहे. तसेच ३० सप्टेंबरआधी जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याची निवडणूक आयोगाची योजना आहे. ही मर्यादा सुप्रीम कोर्टाने ठरवली आहे.


आयोगाने निवडणूक संबंधीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नुकताच जम्मू-काश्मीर आणि हरयाणाचा दौरा केला होता मात्र त्यांनी महाराष्ट्राचा दौरा अद्याप केलेला नाही.
Comments
Add Comment

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,

चीनच्या उत्पादनांवर ‘अँटी-डंपिंग’ शुल्क

केंद्र सरकारचा धाडसी निर्णय नवी दिल्ली : देशातील स्थानिक उद्योगांना बळ देण्यासाठी आणि 'ईज ऑफ डूइंग बिझनेस'ला

केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर निवडला गेला आहे. तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये शुक्रवारी

‘हा तर संविधानाच्या मूलभूत रचनेला धक्का’

एअर प्युरिफायरवरील जीएसटी कपातीच्या हायकोर्टाच्या सूचनेवर केंद्र सरकारचा आक्षेप नवी दिल्ली : जीएसटी कमी

अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही !

भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा सुमारे तीन हजार हल्ल्यांचा पुरावा नवी दिल्ली : बांगलादेशातील ढासळती

महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीसह देशातील वीस मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील वीस मुलांना