निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद, हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये होणार निवडणुकीची घोषणा

  64

नवी दिल्ली: निवडणूक आयोग आज चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करणार आहे. निवडणूक आयोग हरयाणा, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. याशिवाय निवडणूक आयोग झारखंड आणि महाराष्ट्रातही निवडणुकीच्या तारखांची घोषणा करू शकते.


निवडणूक आयोग आज दुपारी तीन वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. यात जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. याशिवाय आज हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखांचीही घोषणा केली जाऊ शकते. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदा विधानसभा निवडणुका होत आहेत. आयोगाने गेल्याच आठवड्यात जम्मू-काश्मीर आणि हरयाणाचा दौरा पूर्ण केला होता.



दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद


निवडणक आयोगाने दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. मात्र यावेळी कोणत्या राज्यांतील निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर करणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. हरयाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ तीन नोव्हेंबर आणि २६ नोव्हेंबरला समाप्त होत आहे. तसेच ३० सप्टेंबरआधी जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याची निवडणूक आयोगाची योजना आहे. ही मर्यादा सुप्रीम कोर्टाने ठरवली आहे.


आयोगाने निवडणूक संबंधीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नुकताच जम्मू-काश्मीर आणि हरयाणाचा दौरा केला होता मात्र त्यांनी महाराष्ट्राचा दौरा अद्याप केलेला नाही.
Comments
Add Comment

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व

Longest Tunnel T50 Vande Bharat : जम्मू-श्रीनगर-बारामुला रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्ण! T-५० मधून सुसाट धावली वंदे भारत; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला प्रवास

जम्मू-कश्मीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी जम्मू-कश्मीरमधील कटरा (Katra) आणि श्रीनगर (Shrinagar)