Election Commission : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका कार्यक्रम कसा असणार?

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद!


नवी दिल्ली : राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election) वारे वाहू लागले आहेत. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commisssion) आज दुपारी ३ वाजता महत्वाची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत आयोग जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त हरियाणा विधानसभा निवडणुकीचीही घोषणा होण्याची शक्यता आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदा जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी मुख्य निवडणूक आयोग राजीव कुमार यांनी जम्मू-काश्मीर आणि हरियाणातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. हरियाणामध्ये विधानसभेच्या ९० जागा आहेत. आता तिथे ३ जागा रिक्त आहेत. तेथे भाजपचे ४१ आमदार, काँग्रेसचे २९ आमदार, जेजेपीचे १० आणि INLD आणि HLP चा एक आमदार आहे. तर पाच अपक्ष आमदार आहेत.


जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या. मे २०२२ पर्यंत जम्मू-काश्मीर विधानसभेत एकूण ९० मतदारसंघ झाले आहेत. त्यात जम्मूमध्ये ४३ आणि काश्मीरमध्ये ४७ विधानसभा आहेत. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ८७ जागा होत्या. २०१९ साली कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. तर तेथील राजकीय पक्षांकडून राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली जात आहे. तर केंद्र सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे की, सुरुवातीला निवडणुका होतील, त्यानंतर राज्याचा दर्जा पुन्हा मिळेल.


मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये तीन किंवा चार टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. जम्मू आणि काश्मीर निवडणुकीत सुरक्षेचं मोठं आव्हान असणार आहे. मागील काही दिवसांपासून दहशतवादी कारवाया वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. याचा परिणाम निवडणुकीवरही दिसण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात

परिक्षेत प्रश्न विचारला आणि दिल्लीच्या विद्यापीठातील प्राध्यापकाचे थेट निलंबन! काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली: दिल्लीतील महाविद्यालयं आणि शाळांबाबत नेहमीच काहीतरी विषय चर्चेत असतो. अशाच प्रकारे दिल्लीतील