Samruddhi Mahamarg : नागरिकांचा होणार जलद प्रवास; नागपूरहून भिवंडी गाठता येणार अवघ्या आठ तासांत!

  68

समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे काम प्रगतिपथावर


छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून समृद्धी महामार्गाकडे (Samruddhi Mahamarg) पाहिले जाते. हा मार्ग ७०१ किलोमीटर लांबीचा असून सध्या या महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आतापर्यंत या महामार्गाचे ६२५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून त्यावर वाहतूक देखील सुरू झाली आहे. विशेष म्हणजे बाकी राहिलेले ७६ किलोमीटरचे काम देखील जलद गतीने सुरू असून येत्या काही दिवसांनी हा संपूर्ण महामार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता नागरिकांचा अतिवेगाने प्रवास होणार असून वाहन इंधनाची देखील बचत होणार आहे.


समृद्धी महामार्गावरील नागपूर ते मुंबई या अंतिम टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. या टप्प्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले असून येत्या सप्टेंबर अखेपर्यंत हा टप्पा संपूर्णरित्या पूर्ण करुन हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर नागपूर ते भिवंडी अंतर केवळ आठ तासांत पूर्ण होणार आहे. तर, इगतपूरी ते अमणे हे अंतर सव्वा तासांत पूर्ण करता येणार आहे. त्याचबरोबर, ठाणे ते नाशिकसाठी केवळ अडीच तास लागणार आहेत. समृद्धी महामार्गाच्या या टप्प्यामुळं प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. त्यामुळे इंधनाची बचतदेखील होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.



इगतपुरी ते कसारा ८ मिनिटांचा प्रवास


दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्यात एकूण ५ बोगदे आहेत. त्यातील इगतपुरी येथील आठ किमीचा बोगदा महाराष्ट्रातील मोठ्या लांबीचा बोगदा आहे. या बोगद्यामुळे प्रवाशांना अवघ्या आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा अंतर गाठता येणार आहे.

Comments
Add Comment

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून

जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे, परराष्ट्र मंत्र्यांकडे आ. निलेश राणे यांची मागणी

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांना भरवा लागणार युजर शुल्क

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू