पंतप्रधान मोदी शनिवारी केरळला जाणार, वायनाड भूस्सखल ठिकाणांचा करणार दौरा

  82

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्टला केरळच्या वायनाडमध्ये भूस्सखलन प्रभावित ठिकाणांचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान हवाई सर्वेक्षण करणार आहेत. वायनाडमध्ये भूस्सखलनामुळे तब्बल ३०० लोकांचा मृत्यू झाला.

३० जुलै २०२४ला केरळच्या वायनाड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्सखलन झाले. ४२० लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा मिळाला आहे. तर १५० जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. याशिवाय कमीत कमी २७३ जण जखमी झाले.

सैन्य दल लवकरच संपवणार बचाव अभियान


सैन्यदलाचे जवान, एसओजी अधिकारी आणि वन अधिकाऱ्यांची विशेष टीम जंगलातील सूजीपारामध्ये सनराईज व्हॅलीमध्ये तपास अभियान सुरू आहे.

३० जुलैनंतर सुरू झालेले दहा दिवसांच्या बचाव अभियानानंतर भारतीय सैन्य दल लवकरच वायनाडमधून परतण्यासाठी तयार आहे. सैन्य दल हे बचाव अभियान एनडीआरएफ, एसडीआरएफ, फायर फोर्स आणि केरळ पोलिसांकडे सोपवणार आहे.

मुख्यमंत्री विजयन यांनी केंद्र सरकारकडे केले हे अपील


एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना केरळचे मुख्यमंत्री म्हणाले की राज्याने केंद्र सरकारला ही आपत्ती नैसर्गिक आपत्ती असल्याचे जाहीर करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री विजयन म्हणाले की आतापर्यंत ४२० मृतदेहांचे पोस्टमार्टेम करण्यात आले आहे आणि वायनाडमध्ये तपास तसेच बचाव अभियान सुरू आहे.

 
Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )