पंतप्रधान मोदी शनिवारी केरळला जाणार, वायनाड भूस्सखल ठिकाणांचा करणार दौरा

  70

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्टला केरळच्या वायनाडमध्ये भूस्सखलन प्रभावित ठिकाणांचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान हवाई सर्वेक्षण करणार आहेत. वायनाडमध्ये भूस्सखलनामुळे तब्बल ३०० लोकांचा मृत्यू झाला.

३० जुलै २०२४ला केरळच्या वायनाड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्सखलन झाले. ४२० लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा मिळाला आहे. तर १५० जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. याशिवाय कमीत कमी २७३ जण जखमी झाले.

सैन्य दल लवकरच संपवणार बचाव अभियान


सैन्यदलाचे जवान, एसओजी अधिकारी आणि वन अधिकाऱ्यांची विशेष टीम जंगलातील सूजीपारामध्ये सनराईज व्हॅलीमध्ये तपास अभियान सुरू आहे.

३० जुलैनंतर सुरू झालेले दहा दिवसांच्या बचाव अभियानानंतर भारतीय सैन्य दल लवकरच वायनाडमधून परतण्यासाठी तयार आहे. सैन्य दल हे बचाव अभियान एनडीआरएफ, एसडीआरएफ, फायर फोर्स आणि केरळ पोलिसांकडे सोपवणार आहे.

मुख्यमंत्री विजयन यांनी केंद्र सरकारकडे केले हे अपील


एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना केरळचे मुख्यमंत्री म्हणाले की राज्याने केंद्र सरकारला ही आपत्ती नैसर्गिक आपत्ती असल्याचे जाहीर करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री विजयन म्हणाले की आतापर्यंत ४२० मृतदेहांचे पोस्टमार्टेम करण्यात आले आहे आणि वायनाडमध्ये तपास तसेच बचाव अभियान सुरू आहे.

 
Comments
Add Comment

Cloudburst Updates : एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर, भूस्खलन अन् ३० जण... हिमाचल प्रदेशात हाहाकार

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशात नैसर्गिक संकटाने तेथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. अनेक रस्ते भूस्खलनाने बंद

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे