पंतप्रधान मोदी शनिवारी केरळला जाणार, वायनाड भूस्सखल ठिकाणांचा करणार दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्टला केरळच्या वायनाडमध्ये भूस्सखलन प्रभावित ठिकाणांचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान हवाई सर्वेक्षण करणार आहेत. वायनाडमध्ये भूस्सखलनामुळे तब्बल ३०० लोकांचा मृत्यू झाला.

३० जुलै २०२४ला केरळच्या वायनाड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्सखलन झाले. ४२० लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा मिळाला आहे. तर १५० जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. याशिवाय कमीत कमी २७३ जण जखमी झाले.

सैन्य दल लवकरच संपवणार बचाव अभियान


सैन्यदलाचे जवान, एसओजी अधिकारी आणि वन अधिकाऱ्यांची विशेष टीम जंगलातील सूजीपारामध्ये सनराईज व्हॅलीमध्ये तपास अभियान सुरू आहे.

३० जुलैनंतर सुरू झालेले दहा दिवसांच्या बचाव अभियानानंतर भारतीय सैन्य दल लवकरच वायनाडमधून परतण्यासाठी तयार आहे. सैन्य दल हे बचाव अभियान एनडीआरएफ, एसडीआरएफ, फायर फोर्स आणि केरळ पोलिसांकडे सोपवणार आहे.

मुख्यमंत्री विजयन यांनी केंद्र सरकारकडे केले हे अपील


एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना केरळचे मुख्यमंत्री म्हणाले की राज्याने केंद्र सरकारला ही आपत्ती नैसर्गिक आपत्ती असल्याचे जाहीर करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री विजयन म्हणाले की आतापर्यंत ४२० मृतदेहांचे पोस्टमार्टेम करण्यात आले आहे आणि वायनाडमध्ये तपास तसेच बचाव अभियान सुरू आहे.

 
Comments
Add Comment

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था