Paris Olympic 2024: भारताला मिळाले सहावे पदक, अमन सहरावतने कुस्तीमध्ये जिंकले कांस्यपदक

मुंबई: पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये भारताने सहावे पदक मिळवले आहे. अमन सहरावतने पुरूषांच्या ५७ किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली. त्याने प्युर्टो रिकोच्या डारियन क्रूझला १३-५ असे हरवले. हे भारताचे पॅरिस ऑलिम्पिक २०२४मधील हे सहावे पदक आहे. भारताने आतापर्यंत या ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य आणि ५ कांस्यपदक जिंकले आहेत.


अमन सहरावत या कुस्तीमध्ये सुरूवातीपासूनच वरचढ ठरला होता. प्रतिस्पर्धी कुस्तीपटूने एकवेळ ३-२ अशी आघाडी घेत रंगत आणली मात्र त्यानंतर अमनने जबरदस्त कमबॅक करत कुस्ती जिंकली.



१६ वर्षांची परंपरा राखली कायम


भारत २००८ बीजिंग ऑलिम्पिकपासून कुस्तीमध्ये नेहमीच ऑलिम्पिक पदक जिंकत आलेला आहे. २००८मध्ये सुशील कुमारने कांस्यपदक जिंकत इतिहास रचला होता. सुशीलने त्यानंतर २०१२मध्ये आपल्या पदकाचा रंग बदलत रौप्यपदक जिंकले होते. त्याच वर्षी योगेश्वर दत्तने कांस्यपदकाची कमाई केली होती. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कांस्यपदक जिंकत तिरंगा फडकावला होता. तर २०२०मध्ये रवी दहिया आणि बजरंग पुनियाने तर आता अमन सेहरावतने ही परंपरा कायम राखली.

२००८ बीजिंग ऑलिम्पिक - सुशील कुमार(कांस्य पदक)

२०१३ लंडन ऑलिम्पिक - सुशील कुमार(रौप्य पदक), योगेश्वर दत्त(कांस्य)

२०१६ रिओ ऑलिम्पिक - साक्षी मलिक(कांस्यपदक)

२०२० टोकियो ऑलिम्पिक - रवी दहिया(रौप्य पदक), बजरंग पुनिया(कांस्य)

२०२४ पॅरिस ऑलिम्पिक - अमन सहरावत(कांस्यपदक)
Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात