‘नमुंमपा’मध्ये बायोमेट्रिक हजेरीचे तीनतेरा!

  90

आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली


नवी मुंबई : महापालिकेतील सर्व अधिकारी-कर्मचारी यांना कार्यालयीन वेळ आणि शिस्त पालनाचे निर्देश नुकतेच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले होते. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्यानंतर काही दिवसांनी 'सजग नागरिक मंच-नवी मुंबई'च्या सभासदांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी कर्मचारी-अधिकारी यांच्या बायोमेट्रीक हजेरी नियम पालनाबाबतची पडताळणी केली. यावेळी महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप 'सजग नागरिक मंच'द्वारे करण्यात आला आहे.


'सजग नागरिक मंच'च्या वतीने १२ जुलै २०२४, २ ऑगस्ट आणि ५ ऑगस्ट २०२४ रोजी महापालिका मुख्यालयाच्या सर्व विभागात पाहणी करण्यात आली. वेळ, स्थळ दर्शवणाऱ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून फोटो काढण्यात आले. सकाळी १०.१५ पर्यंत बहुतांश कार्यालये ओस पडलेली दिसून आली. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा सुविधानुसार कार्यालयाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ असली तरी बहुतांश कर्मचारी सकाळी १०.३० ते ११.३० पर्यंत कार्यालयात येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. अगदी उपायुक्त दर्जाचे अधिकारी देखील १०.३० ते ११ च्या दरम्यान कार्यालयात येतात. तर अनेक कार्यकारी अभियंता ११ वाजल्यानंतर कार्यालयात येत असल्याचे'सजग नागरिक मंच'चे म्हणणे आहे. इतकेच नव्हे, तर आयुक्तांच्या महापालिकेतील उपस्थितीबाबत देखील 'सजग नागरिक मंच'ने नोंद घेत, त्यांच्या वेळेबाबत आक्षेप घेतला आहे.


महापालिका प्रशासनाचा धाक नसल्यानेच महापालिकेच्या शहर अभियंता, परवाना, शिक्षण आणि विधी विभाग आदि सर्वच ठिकाणी 'आओ जाओ घर तुम्हारा' अशा प्रकारचा बेशिस्त कारभार चालू असल्याचे सुस्पष्टपणे दिसून येत असल्याचा आरोप 'सजग नागरिक मंच'ने केला आहे. मुख्यालयात जिथे आयुक्त बसतात, जिथे प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी बसतात, त्या ठिकाणी अगदी उघडपणे कार्यालयीन वेळ शिस्त पालनाचे तीनतेरा वाजत असतील, तर महापालिकेच्या वॉर्ड स्तरावरील कार्यालयात काय परिस्थिती असू शकेल, याचा विचार देखील केला जाऊ शकत नाही, असे 'सजग नागरिक मंच'चे सुधीर दाणी यांनी सांगितले.


एकीकडे कुठल्याही प्रकारची जाण्या-येण्याची सुविधा नसताना, सफाई कामगारांना सकाळी ६ वाजता हजर राहणे बंधनकारक आहे. त्यांना बायोमेट्रिक हजेरी नोंदवणे अनिवार्य असताना घरापासून वाहनांची सुविधा असणाऱ्या अधिकारी वर्गाला बायोमेट्रिकचे वावडे का? महापालिका अधिकारी आम्हाला बायोमेट्रिक हजेरी सक्तीची नाही असे कसे सांगू शकतात? असा प्रश्न 'मंच'चे सदस्य भीमराव जामखंडीकर यांनी उपस्थित केला.


महापालिका प्रशासनाने आपल्या सर्व कर्मचारी-अधिकारी यांच्या बायोमेट्रिक हजेरीचा तपशील पब्लिक डोमेनवर खुला करावा. जेणेकरून करदात्या नागरिकांना आपण कर भरत असलेल्या महापालिकेतील कर्मचारा-अधिकारी कार्यालयात वेळेत येतात का ? वेळेत जातात का? याची माहिती मिळू शकेल. नागरिकांचा तो मूलभूत अधिकार असल्याचे 'सजग नागरिक मंच'चे म्हणणे आहे

Comments
Add Comment

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा