Prakash Solanke : अजितदादांच्या आमदाराची राजकीय निवृत्ती!

पुतण्याला घोषित केलं राजकीय वारसदार


मुंबई : सध्या राज्यभरात आगामी विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha Election) धामधूम सुरु आहे. सर्वच पक्ष यासाठी कंबर कसून तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत आलेलं अपयश लक्षात घेता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसेनेही जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र, त्यातच अजितदादांचे माजलगावचे (Majalgaon) आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे अजित पवार गटासाठी हा एक धक्का आहे. असं असलं तरी प्रकाश सोळंके यांनी त्यांचा राजकीय वारसदार जाहीर केला आहे.


अजित पवार गट विधानसभेसाठी जुळवाजुळव करत असतानाच प्रकाश सोळंके यांनी घेतलेल्या राजकीय निवृत्तीची चर्चा रंगली आहे. त्यांनी आगामी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. सध्या प्रकाश सोळंके हे २०२४ च्या आमदारकीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गावांचे दौरे करत आहेत. त्याचवेळी एका गावात बोलताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. याचसोबत त्यांनी राजकीय वारसदार म्हणून पुतण्या जयसिंह सोळंके (Jaisingh Solanke) यांच्या नावाची घोषणा केली आहे.


माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे लहान बंधू धैर्यशील सोळंके यांचे जयसिंह सोळंके हे चिरंजीव आहेत. जयसिंह सोळंके धारूर पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले आहेत. त्यासोबतच बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष म्हणून जयसिंह सोळंके यांनी यापूर्वी काम पाहिलं होतं. आता जयसिंह सोळंके हेच प्रकाश सोळंके यांचे वारसदार म्हणून आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री