Prakash Solanke : अजितदादांच्या आमदाराची राजकीय निवृत्ती!

  166

पुतण्याला घोषित केलं राजकीय वारसदार


मुंबई : सध्या राज्यभरात आगामी विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha Election) धामधूम सुरु आहे. सर्वच पक्ष यासाठी कंबर कसून तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत आलेलं अपयश लक्षात घेता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसेनेही जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र, त्यातच अजितदादांचे माजलगावचे (Majalgaon) आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे अजित पवार गटासाठी हा एक धक्का आहे. असं असलं तरी प्रकाश सोळंके यांनी त्यांचा राजकीय वारसदार जाहीर केला आहे.


अजित पवार गट विधानसभेसाठी जुळवाजुळव करत असतानाच प्रकाश सोळंके यांनी घेतलेल्या राजकीय निवृत्तीची चर्चा रंगली आहे. त्यांनी आगामी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. सध्या प्रकाश सोळंके हे २०२४ च्या आमदारकीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गावांचे दौरे करत आहेत. त्याचवेळी एका गावात बोलताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. याचसोबत त्यांनी राजकीय वारसदार म्हणून पुतण्या जयसिंह सोळंके (Jaisingh Solanke) यांच्या नावाची घोषणा केली आहे.


माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे लहान बंधू धैर्यशील सोळंके यांचे जयसिंह सोळंके हे चिरंजीव आहेत. जयसिंह सोळंके धारूर पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले आहेत. त्यासोबतच बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष म्हणून जयसिंह सोळंके यांनी यापूर्वी काम पाहिलं होतं. आता जयसिंह सोळंके हेच प्रकाश सोळंके यांचे वारसदार म्हणून आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची