रत्नागिरी येथे होणार भंडारी समाजाचे महाअधिवेशन

  456

मुंबई: महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर भंडारी समाज मोठ्या संख्येने वसलेला आहे. भंडारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाज एकत्र करणे काळाची गरज आहे. समाजाची शैक्षणीक, सामाजिक आर्थिक आणि राजकीय उन्नती साधायची असेल तर एकत्र येऊन भंडारी भविष्याचा वेध घेणे क्रमप्राप्त आहे.


कोकणात पालघर , ठाणे , मुंबई, रायगड , रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा तसेच पुणे नांदेड या ठिकाणी भंडारी समाज वास्तव्यास आहे . अनेक मंडळांच्या माध्यमातून भंडारी समाजाचे सामाजिक कार्य चालू आहे. या सर्व मंडळाना एकत्र करून रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०:०० ते ५:०० यावेळेत सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे अधिवेशन आयोजीत करण्यात आले आहे.


शैक्षणिक , सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक विषयांवर चर्चासत्र होवून त्यामध्ये समाजहिताचे काही ठराव संमत केले जाणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक , गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक, भंडारी नेते अनिल होबळे, माजी मंत्री कालिदास कोळंबकर, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ सुहास पेडणेकर, भंडारी समाज नेते नवीनचंद्र बांदिवडेकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, पत्रकार राजेश कोचरेकर, बिपीन मयेकर , सुभाष मयेकर उपस्थित राहणार आहेत.


या कार्यक्रमाचे नियोजन रत्नागिरी भंडारी समाजाच्या माध्यमातून केले जाणार आहे

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण