रत्नागिरी येथे होणार भंडारी समाजाचे महाअधिवेशन

मुंबई: महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर भंडारी समाज मोठ्या संख्येने वसलेला आहे. भंडारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाज एकत्र करणे काळाची गरज आहे. समाजाची शैक्षणीक, सामाजिक आर्थिक आणि राजकीय उन्नती साधायची असेल तर एकत्र येऊन भंडारी भविष्याचा वेध घेणे क्रमप्राप्त आहे.


कोकणात पालघर , ठाणे , मुंबई, रायगड , रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा तसेच पुणे नांदेड या ठिकाणी भंडारी समाज वास्तव्यास आहे . अनेक मंडळांच्या माध्यमातून भंडारी समाजाचे सामाजिक कार्य चालू आहे. या सर्व मंडळाना एकत्र करून रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०:०० ते ५:०० यावेळेत सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे अधिवेशन आयोजीत करण्यात आले आहे.


शैक्षणिक , सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक विषयांवर चर्चासत्र होवून त्यामध्ये समाजहिताचे काही ठराव संमत केले जाणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक , गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक, भंडारी नेते अनिल होबळे, माजी मंत्री कालिदास कोळंबकर, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ सुहास पेडणेकर, भंडारी समाज नेते नवीनचंद्र बांदिवडेकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, पत्रकार राजेश कोचरेकर, बिपीन मयेकर , सुभाष मयेकर उपस्थित राहणार आहेत.


या कार्यक्रमाचे नियोजन रत्नागिरी भंडारी समाजाच्या माध्यमातून केले जाणार आहे

Comments
Add Comment

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी

IRCTC Website Crash : ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि ॲप अचानक ठप्प

दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची मोठी गैरसोय दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना आज एक मोठी तांत्रिक

सिंधुदुर्गात एसटी बसच्या संख्या वाढवा

मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे

सिंधुदुर्गात वाड्या, रस्त्यांच्या जातीवाचक नावांऐवजी आता महापुरुषांची नावे

नावे बदलणारा राज्यातील पहिला जिल्हा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक