Wayanad Landslide : नैसर्गिक आपत्तीचा चोरट्यांनी घेतला फायदा; वायनाडमध्ये भूस्खलनानंतर घर सोडलेल्यांच्या घरात चोरी!

  87

वायनाड : वायनाड जिल्ह्यातील काही गावांमध्ये ३० जुलै रोजी भीषण भूस्खलन (Wayanad Landslide) झाले होते. त्यामुळे तीन ते चार गावे बाधित झाली असून यामध्ये तब्बल ३५७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. भूस्खलन झाल्यानंतर यंत्रणेकडून बचाव कार्य सुरू असताना शेकडो लोकांना घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. मात्र चार दिवसांनंतर पुन्हा आपल्या घरी परतलेल्या लोकांना धक्का बसला आहे. अनेकांच्या घरात चोरी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकीकडे भूस्खलन तर दुसरीकडे चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, वायनाडमधील भूस्खलनानंतर बाधित लोकांना रेस्क्यू टीमने काही काळासाठी स्थलांतरित केले होते. चार दिवसांनंतर जेव्हा नागरिक पुन्हा घरी परतले, तेव्हा त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू गहाळ झाल्या असल्याचे लक्षात आले. इतकेच नव्हे तर काहींच्या घरातील कपडेही चोरांनी चोरी केले. त्यामुळे आधीच भूस्खलनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसमोर मोठ्या समस्या उभ्या राहिल्या आहेत.


दरम्यान, भूस्खलनामुळे आधीच स्वकीय गमावलेल्या नागरिकांच्या मनात आता सर्वस्व गमावल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी चोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली असून रात्रीच्या वेळी परिसरात गस्त वाढविण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच चोरट्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असेही पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )