MP Wall Collapse : धक्कादायक! मातीचे शिवलिंग बनवताना भिंत कोसळल्याने ९ चिमुकल्यांचा मृत्यू

भोपाळ : सध्या केरळच्या वायनाडमधील भूस्खलनामुळे (Wayanad Landslide) देशभारतून हळहळ व्यक्त होत असतानाच मध्यप्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यामध्ये आज सकाळी मातीची भिंत कोसळल्याची (MP Wall Collapse) दुर्घटना घडली. यामध्ये ९ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता असून बचावकार्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सागर जिल्ह्यातील शाहपूरच्या हरदौल मंदिरात शिवलिंगाचे बांधकाम आणि भगवत कथेचे आयोजन सुरू आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच याठिकाणी शिवलिंगांची निर्मिती केली जात आहे. रविवारीही शिवलिंग बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. तसेच आज रविवारची शाळेला सुट्टी असल्यामुळे मातीचे शिवलिंग बनवण्यासाठी ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलेही मोठ्या संख्येने आली होती.


परंतु शिवलिंग बनवत असताना सकाळी ८ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास मंदिर परिसराला लागून असलेली पन्नास वर्षे जुनी मातीची भिंत थेट चिमुकल्यांच्या अंगावर कोसळली. यामुळे येथील ९ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन तातडीने बचावकार्यास सुरुवात केली.



मुख्यमंत्र्यांकडून ४ लाख रुपयांची मदत जाहीर


मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला. तसेच मृत मुलांच्या कुटुंबीयांसाठी ४ लाखांची मदत जाहीर केली. जखमी मुलांवर योग्य ते उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. यावेळी मोहन यादव म्हणाले, 'सागर जिल्ह्यातील शाहपूर या गावात भिंत कोसळून नऊ मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून माझे मन हेलावून गेले. मी जिल्हा प्रशासनाला निर्देश देऊन जखमींवर योग्य ते उपचार करण्यास सांगितले आहे'.


त्याचबरोबर मृत मुलांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच जखमी मुलांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होवो, आणि ज्यांनी आपली मुलं गमावली त्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना देखील मुख्यमंत्री मोहन यादव यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या

ESMA Act : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'एस्मा' कायदा लागू

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा

गॅस पुरवठ्याबाबत केंद्राचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली: पश्चिम आशियामध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला असून, त्याचे पडसाद