Pune Rain : पुण्यातील धरणक्षेत्रात पावसाची मुसळधार; पुणेकरांना सतर्कतेचा इशारा!

  85

पुणे : मुंबईत मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरूच असल्याचे दिसून येत आहे. (Rain Update) अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरीही काही धरणक्षेत्रात मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. पुण्यातील (Pune News) पाणलोट धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी (Heavy Rain) होत असून धरणे पूर्ण भरले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असून इतर जिल्ह्यांनाही अलर्ट जारी केला आहे.


पुण्यात पावसाने काही दिवसांपासून विश्रांती घेतली असली तरीही खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांजवळ मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ खाल्याने या धरणांतून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणातून सध्या २७ हजार १६ क्युसेक्स, मुळशीतून २७ हजार ६०९ क्युसेक्स, पवनातून ५ हजार क्युसेक्स, चासकमान धरणातून ८ हजार ५० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे. तसेच विसर्गाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.



या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट


पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्यामुळे या ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

अजित पवारांच्या मुलापाठोपाठ पुतण्याचाही साखपुडा

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार याचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी झाला. आता अजित पवारांचा

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा