Pune Rain : पुण्यातील धरणक्षेत्रात पावसाची मुसळधार; पुणेकरांना सतर्कतेचा इशारा!

पुणे : मुंबईत मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरूच असल्याचे दिसून येत आहे. (Rain Update) अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरीही काही धरणक्षेत्रात मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. पुण्यातील (Pune News) पाणलोट धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी (Heavy Rain) होत असून धरणे पूर्ण भरले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असून इतर जिल्ह्यांनाही अलर्ट जारी केला आहे.


पुण्यात पावसाने काही दिवसांपासून विश्रांती घेतली असली तरीही खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांजवळ मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ खाल्याने या धरणांतून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणातून सध्या २७ हजार १६ क्युसेक्स, मुळशीतून २७ हजार ६०९ क्युसेक्स, पवनातून ५ हजार क्युसेक्स, चासकमान धरणातून ८ हजार ५० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे. तसेच विसर्गाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.



या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट


पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्यामुळे या ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद