Kalyan news : कल्याणमध्ये घाटकोपरची पुनरावृत्ती! होर्डिंग कोसळल्याने दोघे जखमी

दुर्घटनेत अनेक गाड्यांचं नुकसान


कल्याण : मे महिन्यात मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घडली. भलंमोठं होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळलं व १७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला तर ७० हून अधिक लोक जखमी झाले. याच घटनेची कल्याणमध्ये पुनरावृत्ती झाली आहे. मात्र, सुदैवाने मोठी जीवितहानी होता होता टळली आहे. कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळून मोठा अपघात झाला. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत, तर अनेक गाड्यांचं नुकसान झालं आहे.


सहजानंद चौक हा कल्याण शहरातला गजबजलेला चौक आहे. या चौकात ऐन गर्दीच्या वेळी भलं मोठं होर्डिंग कोसळून अपघात झाला. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या रस्त्याच्या एका बाजूला अनेक दुकानं तर दुसऱ्या बाजूला एक रुग्णालय आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस घटनास्थळी आले असून होर्डिंग हटवण्यासाठी अग्निशमन दलाचं पथकही आलं आहे.


होर्डिंगखाली ४ ते ५ गाड्या अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अग्निशामक दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कोसळलेल्या होर्डिंला पालिका अधिकाऱ्यांकडून परवानगी दिल्याची माहिती मिळत आहे. पण पुन्हा तशीच घटना कल्याणमध्ये घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Comments
Add Comment

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करणार

-- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; पत्रकारांच्या समस्यांवर व्यापक बैठक घेणार मुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र

हा फक्त राष्ट्रपतींचा नव्हे, तर संविधानाचा अपमान, पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून

देशात पेट्रोल-डिझेलची कमतरता नाही, भारताकडे ४ हजार कोटी लिटर तेल; आठ आठवडे इतका पुरेसा साठा

नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धादरम्यान भारताला कच्च्या तेलाची कमतरता भासणार नाही. भारताकडे सध्या

भारताला पराभूत करत ऑस्ट्रेलियाचा एलिसा हेलीला विजयी निरोप

पर्थ : ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक पिंक बॉल कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने तिसऱ्या दिवशीच भारतीय महिला

कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस