Kalyan news : कल्याणमध्ये घाटकोपरची पुनरावृत्ती! होर्डिंग कोसळल्याने दोघे जखमी

दुर्घटनेत अनेक गाड्यांचं नुकसान


कल्याण : मे महिन्यात मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घडली. भलंमोठं होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळलं व १७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला तर ७० हून अधिक लोक जखमी झाले. याच घटनेची कल्याणमध्ये पुनरावृत्ती झाली आहे. मात्र, सुदैवाने मोठी जीवितहानी होता होता टळली आहे. कल्याणच्या सहजानंद चौकात होर्डिंग कोसळून मोठा अपघात झाला. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत, तर अनेक गाड्यांचं नुकसान झालं आहे.


सहजानंद चौक हा कल्याण शहरातला गजबजलेला चौक आहे. या चौकात ऐन गर्दीच्या वेळी भलं मोठं होर्डिंग कोसळून अपघात झाला. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या रस्त्याच्या एका बाजूला अनेक दुकानं तर दुसऱ्या बाजूला एक रुग्णालय आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस घटनास्थळी आले असून होर्डिंग हटवण्यासाठी अग्निशमन दलाचं पथकही आलं आहे.


होर्डिंगखाली ४ ते ५ गाड्या अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अग्निशामक दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कोसळलेल्या होर्डिंला पालिका अधिकाऱ्यांकडून परवानगी दिल्याची माहिती मिळत आहे. पण पुन्हा तशीच घटना कल्याणमध्ये घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Comments
Add Comment

आंगणेवाडी भराडी देवी जत्रोत्सव ९ फेब्रुवारी २६ रोजी

मसुरे : प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या, नवसास पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची

आमिर खान प्रोडक्शन्सची सरप्राईज भेट! वीर दासचा ‘हॅपी पटेल’ १६ जानेवारी २०२६ ला प्रेक्षकांसमोर

‘हॅपी पटेल’चा धमाकेदार खुलासा! वीर दास आणि मोना सिंगची गुप्तहेर कथा १६ जानेवारी २०२६ रोजी रिलीज आमिर खानचा नवीन

फॉर्च्युनरची डुप्लिकेट नंबर प्लेट, अवैध शस्त्र आणि पूर्वगुन्हेगाराशी संबंध; पनवेलमधील पार्किंगमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस

नवी मुंबई: पनवेल पूर्व रेल्वे स्टेशन परिसरात एक फॉर्च्युनर कार संशयास्पदरित्या आढळून आल्याचे दिसले. महत्त्वाचे

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर