Ganeshotsav 2024 : गणेश मंडळांसाठी आनंदवार्ता! एकाचवेळी मिळणार पुढील ५ वर्षांसाठी मंडप उभारण्याची परवानगी

  237

प्रशासनाने सुरु केली नवी योजना


मुंबई : येत्या ७ सप्टेंबर रोजी सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे (Ganeshotsav 2024) आगमन होणार आहे. यासाठी एक दोन महिन्यांपूर्वीच सर्व गणेशभक्त गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज होतात. तसेच ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन होण्यास सुरुवात होते. परंतु त्याआधी मंडळांना महापालिकेकडून (BMC) मंडप बांधण्याची परवानगी घ्यावी लागते. काही दिवसांपूर्वीच महापालिकेने गणेश मंडळाना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी 'एक ऑनलाइन खिडकी योजना' राबवून देण्याची घोषणा केली होती. परंतु ही योजना सुरु करण्यासाठी यंदा विलंब झाल्यामुळे गणेश मंडळांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने गणेश मंडळांसाठी आनंदाची घोषणा केली आहे. त्यानुसार मंडळांना आता एकाच वेळी पुढील पाच वर्षांसाठी मंडप उभारण्याची परवानगी मिळणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी लागणाऱ्या परवानगीसाठी 'एक ऑनलाइन खिडकी योजना' ६ ऑगस्टपासून सुरू केली जाणार आहे. त्याबाबत राज्य सरकारच्या निर्णयानुसार गेली दहा वर्ष नियमांचे आणि कायद्याचे पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाच्या गणेशोत्सवापासून सलग पाच वर्षांसाठी विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक अथवा खासगी जागेवर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी गेल्या दहा वर्षांत सर्व नियम कायदे याचे पालन केले आहे आणि त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही, असे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे. मात्र या मंडळांना दरवर्षी परवानगी नुतनीकरण करावे लागणार आहे.


त्याचबरोबर यंदा नव्यानेच सार्वजनिक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी देण्यात येणारी मंडप उभारणीची परवानगी ही एका वर्षासाठीच मर्यादित असणार आहे.



मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज


गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ६ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून ऑनलाइन एक खिडकी पद्धतीने अर्जाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.