Wayanad Landslides: वायनाड भूस्सखलनात आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू, अनेक जण मलब्याखाली असण्याची शक्यता

मुंबई: केरळच्या वायनाड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भूस्सखलनात येथील चार गाव भुईसपाट झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला आहे तर मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. अद्यापही अनेकजण मलब्याखाली दबले असण्याची शक्यता आहे.


आतापर्यंत ३ हजार लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे चिखल, डोंगराचे भाग तसेच झाडांचे मोठमोठे भाग पडल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये समस्या येत आहेत. चूरलमाला च्या मुंडक्कई दरम्यान जो पूल वाहून गेला होता त्याला सैन्याचे जवान पुन्हा बनवत आहेत. यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वेग येईल. आज दुपारपर्यंत चूरलमालाला मुंडक्कईला जोडणारा १९० फूट हा पूल बनून तयार होईल.



राहुल गांधी-प्रियंका गांधी वायनाडसाठी रवाना


लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी नवी दिल्ली येथून वायनाडसाठी रवाना झाले आहेत. ते आपल्या संसदीय क्षेत्राची पाहणी करण्यासाठी तिथे पोहोचत आहेत. त्यांच्यासोबत प्रियंका गांधीही आहेत. भूस्सखलनामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबाची ते भेट घेतील. आधी दोन्ही नेते बुधवारी वायनाडला जाणार होते मात्र खराब हवामानामुळे त्यांना आपला कार्यक्रम स्थगित करावा लागला.



चार गावे झाली नष्ट


वायनाडमधील निसर्गाच्या प्रकोपाने साऱ्यांनाच हादरवून सोडले आहे. अनेक घरे मलब्याखाली दबली आहेत. नदीच्या रस्त्यांमध्ये जे कोणी आले ते वाहून गेले. झाडेच्या झाडे उन्मळून पडली. मोठे मोठे दगड नदीद्वारे वाहून आले होते. काही वेळातच अनेक घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली.

Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने