Wayanad Landslides: वायनाड भूस्सखलनात आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू, अनेक जण मलब्याखाली असण्याची शक्यता

मुंबई: केरळच्या वायनाड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भूस्सखलनात येथील चार गाव भुईसपाट झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला आहे तर मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. अद्यापही अनेकजण मलब्याखाली दबले असण्याची शक्यता आहे.


आतापर्यंत ३ हजार लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे चिखल, डोंगराचे भाग तसेच झाडांचे मोठमोठे भाग पडल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये समस्या येत आहेत. चूरलमाला च्या मुंडक्कई दरम्यान जो पूल वाहून गेला होता त्याला सैन्याचे जवान पुन्हा बनवत आहेत. यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वेग येईल. आज दुपारपर्यंत चूरलमालाला मुंडक्कईला जोडणारा १९० फूट हा पूल बनून तयार होईल.



राहुल गांधी-प्रियंका गांधी वायनाडसाठी रवाना


लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी नवी दिल्ली येथून वायनाडसाठी रवाना झाले आहेत. ते आपल्या संसदीय क्षेत्राची पाहणी करण्यासाठी तिथे पोहोचत आहेत. त्यांच्यासोबत प्रियंका गांधीही आहेत. भूस्सखलनामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबाची ते भेट घेतील. आधी दोन्ही नेते बुधवारी वायनाडला जाणार होते मात्र खराब हवामानामुळे त्यांना आपला कार्यक्रम स्थगित करावा लागला.



चार गावे झाली नष्ट


वायनाडमधील निसर्गाच्या प्रकोपाने साऱ्यांनाच हादरवून सोडले आहे. अनेक घरे मलब्याखाली दबली आहेत. नदीच्या रस्त्यांमध्ये जे कोणी आले ते वाहून गेले. झाडेच्या झाडे उन्मळून पडली. मोठे मोठे दगड नदीद्वारे वाहून आले होते. काही वेळातच अनेक घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली.

Comments
Add Comment

हिंदूंना एकत्र करून हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी पदयात्रा: धीरेंद्र शास्त्री

आग्रा (उत्तर प्रदेश) : आध्यात्मिक नेते धीरेंद्र शास्त्री यांनी आज सांगितले की, हिंदूंना एकत्र करण्यासाठी, हिंदू

बिहारनंतर आता देशभरात लागू होणार 'SIR': निवडणूक आयोगाची दिल्लीत महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये चर्चेत आलेल्या एसआयआर (Systematic Integrity Review) प्रणालीचा आता संपूर्ण देशभरात एकाच

भारताच्या विरोधात कट? अमेरिकेचे लष्करी विमान थेट पाकिस्तानमध्ये उतरल्याने खळबळ

नवी दिल्ली: भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावपूर्ण असतानाच, अमेरिकन हवाई दलाचे एक मोठे लष्करी विमान थेट

प्रयागराजमध्ये गंगा नदीत तीन किशोरवयीन मुले बुडाली

प्रयागराज : प्रयागराज जिल्ह्यातील पुरामुफ्ती परिसरात आज गंगेत आंघोळीसाठी गेलेली तीन किशोरवयीन मुले बुडाली, असे

अयोध्येतील राम मंदिर उद्या दुपारनंतर राहणार बंद

अयोध्या : रविवारी चंद्रग्रहणामुळे रामनगरी अयोध्येतील रामललांचे दर्शन दुपारनंतर घेता येणार नाही. ग्रहणाचे वेध

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २