मुंबई : राज्यात सुरू असलेल्या विकासामुळे विरोधक बिथरले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. एखाद्याला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतोय, घरात बसून फेसबूकवरून सरकार चालवणाऱ्यांचं ते काम नाही, असा टोला त्यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबाला त्रास दिला, आता एक तर ते राहतील किंवा मी राहीन असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात विकास काम सुरू झाला. महाविकास आघाडीची अडीच वर्षे आणि आमच्या महायुतीच्या सरकारची दोन वर्षे यांची तुलना करता लोकांना समजेल. राज्यात सुरू असलेल्या विकासकामांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच पातळी सोडून टीका केली जाते. एखाद्याला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतो. आम्ही फिल्डवर उतरतो आणि काम करतो. त्यामुळे लोकांची पसंती आम्हालाच आहे. येत्या काळात राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…