पंतप्रधान मोदींकडून मंत्री अनुराग ठाकूर यांच्या भाषणाची प्रशंसा

  46

इंडिया आघाडीचे घाणेरडे राजकारण उघड झाल्याचा दावा


नवी दिल्ली : माझे तरुण आणि उत्साही सहकारी अनुराग ठाकूर यांचे हे भाषण आहे, जे ऐकायलाच हवे. त्यात तथ्यांचा समावेश आहे. यातून इंडिया आघाडीचे घाणेरडे राजकारण उघड होत आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीअर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याही भाषणाचा व्हिडीओ शेअर केला. पंतप्रधान मोदींनी श्री ठाकूर यांच्या भाषणाचे कौतुक केले आणि ते "ऐकलेच पाहिजे" असे सांगितले. या वर्षीचा अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकासाठी काय देतो याचे एक अतिशय व्यापक चित्र सादर करतो. विकास आणि सुधारणांसाठी आमच्या सरकारच्या वचनबद्धतेचा अर्थमंत्री निर्मला सीतारमन पुनरुच्चार करत आहेत," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.





लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारची महाभारतात रचलेल्या ‘चक्रव्यूहा’ची तुलना करून हल्लाबोल केला. आताच्या आधुनिक चक्रव्यूहात आधुनिक अभिमन्यूंना अडकवले जात असल्याचे म्हणत राहुल गांधी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. दुसऱ्या दिवशी चर्चेदरम्यान, मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री अनुराग ठाकूर यांच्या भाषणाचे कौतुक केले आहे.


राहुल गांधी यांच्या भाषणानंतर मंगळवारी संसदेत खूप गोंधळ उडाला. लोकसभेत मंत्री अनुराग ठाकूर यांचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यात जोरदार वाद झाला. त्यावरुनच सत्ताधारी आणि विरोध एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनीही अनुराग ठाकूर यांनी सभागृहात दिलेल्या भाषणाचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी अनुराग ठाकूर यांच्या संसदेतील भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.


लोकसभेत सोमवारी राहुल गांधी यांनी कमळाचा हिंसाचाराशी संबंध जोडला होता. त्यानंतर अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या वक्तव्यावर पलटवार करत, कमळाला राजीवसुद्धा म्हणतात, त्यामुळे ते राजीव गांधींनाही वाईट मानतात का? असा सवाल केला. ज्यांची जात कोणाला माहिती नाही, ते आज जातीनिहाय जनगणनेच्या गोष्टी करत आहे, असंही म्हणत त्यांनी राहुल गांधी यांना लक्ष केले. दरम्यान, अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर केलेल्या वक्तव्यानंतर कन्नौजचे खासदार आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि ठाकूर यांच्यात जोरदार वादावादी झाली. अनुराग ठाकूर सभागृहात कोणाच्याही जातीबद्दल कसे बोलू शकतात, असा सवाल अखिलेश यादव यांनी केला.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये