Wayanad Landslide: वायनाड भूस्सखलनात ११६ जणांचा मृत्यू, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

मुंबई: भारतातील केरळ हे पर्यटनाचे सुंदर ठिकाण. देश-विदेशातील पर्यटक येथील स्थळांना भेटी देण्यासाठी येतात. मात्र निसर्गाचा कहर झाला आणि त्याचे भयंकर परिणाम केरळमध्ये पाहायला मिळाले. अशी ही दुर्घटना केरळमध्ये पहिल्यांदाच घडली असावी. कालपर्यंत जिथे हिरवळ पसरली होते तेथे आता केवळ मातीचा चिखल, ढिगाऱ्याखाली अडकेली माणसे, आपल्या जिवाभावाच्या माणसांसाठी फोडला जाणारा हंबरडा इतकेच दिसत आहे.


केरळच्या वायनाड जिल्ह्यात भयंकर दुर्घटना घडली आहे. जोरदार पावसामुळे झालेल्या भूस्सखलनात आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल १३१ जण जखमी झाले आहेत. अद्याप ९० जण अडकल्याची माहिती मिळत आहे.


घटनास्थळी बचावकार्य वेगात सुरू आहे. दर तासागणिक येथील परिस्थिती त्रासदायक होत आहे. बचावकार्यासाठी जवानांची फौज तैनात आहे. केरळ सरकारकडून दोन दिवसाचा शोक घोषित करण्यात आला आहे. मलब्याखाली अनेकजण दबलेले आहेत. त्यांच्या शोध घेण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथकाची मदत घेतली जात आहे.


भूस्सखलनामुळे मेप्पडी, मुंडक्कई डाऊन चूरल माला मध्ये शेकडो लोक घरांखाली तसेच मलब्याखाली दबले गेलेले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने

Rain Alert: दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पाऊस आणि गारपिटीची शक्यता

नवी दिल्ली: दिल्ली एनसीआरमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार वाऱ्यांमुळे हवामान बदलले. हवामान विभागाने संपूर्ण उत्तर