Wayanad Landslide: वायनाड भूस्सखलनात ११६ जणांचा मृत्यू, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

मुंबई: भारतातील केरळ हे पर्यटनाचे सुंदर ठिकाण. देश-विदेशातील पर्यटक येथील स्थळांना भेटी देण्यासाठी येतात. मात्र निसर्गाचा कहर झाला आणि त्याचे भयंकर परिणाम केरळमध्ये पाहायला मिळाले. अशी ही दुर्घटना केरळमध्ये पहिल्यांदाच घडली असावी. कालपर्यंत जिथे हिरवळ पसरली होते तेथे आता केवळ मातीचा चिखल, ढिगाऱ्याखाली अडकेली माणसे, आपल्या जिवाभावाच्या माणसांसाठी फोडला जाणारा हंबरडा इतकेच दिसत आहे.


केरळच्या वायनाड जिल्ह्यात भयंकर दुर्घटना घडली आहे. जोरदार पावसामुळे झालेल्या भूस्सखलनात आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल १३१ जण जखमी झाले आहेत. अद्याप ९० जण अडकल्याची माहिती मिळत आहे.


घटनास्थळी बचावकार्य वेगात सुरू आहे. दर तासागणिक येथील परिस्थिती त्रासदायक होत आहे. बचावकार्यासाठी जवानांची फौज तैनात आहे. केरळ सरकारकडून दोन दिवसाचा शोक घोषित करण्यात आला आहे. मलब्याखाली अनेकजण दबलेले आहेत. त्यांच्या शोध घेण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथकाची मदत घेतली जात आहे.


भूस्सखलनामुळे मेप्पडी, मुंडक्कई डाऊन चूरल माला मध्ये शेकडो लोक घरांखाली तसेच मलब्याखाली दबले गेलेले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

‘त्यांच्याकडून मुलांना पिस्तुल, तर आमच्याकडून लॅपटॉप’

पंतप्रधान मोदींचा विरोधी पक्षांवर घणाघात सीतामढी : ‘हे लोक स्वतःच्या मुलांना मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि

५ रुपयांत पोटभर जेवण!

दिल्लीत १०० 'अटल कँटिन' सुरू करण्याची घोषणा नवी दिल्ली: दिल्ली सरकारने शहरात १०० ठिकाणी 'अटल कँटिन' सुरू करण्याची

संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे आणि १९ डिसेंबरपर्यंत चालेल, अशी घोषणा संसदीय

'बिहारमध्ये घुसखोर नाही, स्थानिकच सरकार बनवतील!'

विकास आणि सुरक्षेसाठी 'एनडीए'ला निवडून देण्याचे अमित शाह यांचे आवाहन पूर्णिया: "बिहारमध्ये घुसखोर सरकार बनवणार

डॉक्टर होता की कसाई, लॉकरमध्ये सापडली एके-४७ रायफल

श्रीनगर : पोलिसांनी एका डॉक्टरच्या लॉकरमधून एके-४७ रायफल जप्त केल्यानंतर खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टरला

भाजपला नवा अध्यक्ष मिळणार, राजनाथ सिंहांनी काय सांगितले?

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या राजकीय निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत नाही, तर तो देशभक्ती आणि