Wayanad landslide : केरळच्या वायनाडमध्ये पावसाचे थैमान! भूस्खलनामुळे १९ जणांचा मृत्यू

शेकडो लोक अडकल्याची भीती; बचावकार्य सुरु


वायनाड : केरळच्या (Kerala) मेप्पाडी भागात मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास भूस्खलनाची घटना घडली. यामध्ये मुंडक्काई, चुरमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या चार गावांना भूस्खलनाचा तडाखा बसला. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून ४०० हून अधिक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी बचावकार्य मदतीचे काम सुरू असताना आज पहाटे पुन्हा केरळमध्ये भूस्खलन (Wayanad landslide) झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. मात्र सलग दोनवेळा भूस्खलन झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ४.१० वाजेच्या सुमारास वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी भागात भूस्खलानाची घटना घडली. या भूस्खलनात दोन चिमुकल्यांसह १९ जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक लोक यामध्ये अडकल्याची शक्यता असून प्रशासनाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. परंतु सध्या केरळमध्ये पावसाच्या संततधार कोसळत असल्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. या दुर्घटनेनंतर १६ जणांना वायनाडमधील मेप्पाडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


दरम्यान, या घटनेनंतर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर या दुर्घटनेची माहिती मिळताच सरकारी यंत्रणा मदतीसाठी धावल्या असून केरळ सरकारकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेनंतर अनेक राज्यमंत्री या दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये 'कुंभदूत' एजेंटिक AI संकल्पनेचे सादरीकरण

सिंहस्थ २०२७ पूर्वी टप्प्याटप्प्याने तंत्रज्ञानाचा उपयोग नवी दिल्ली / नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आता गुपचूप लग्न शक्य नाही? गुजरातमध्ये विवाह नोंदणीसाठी नवा प्रस्ताव

अहमदाबाद : गुजरातमध्ये विवाहाच्या नोंदणीत काही बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या नियमांनुसार, विवाहाची नोंदणी

VIRAL VIDEO : सावधान! देवभूमीचा ट्रिप प्लॅन करताय? हा थरारक व्हिडिओ पाहून तुमचेही पाय लटपटतील!

देहराडून : उत्तराखंडमधील प्रसिद्ध सिद्धपीठ माता धारी देवी मंदिराजवळ नदीपात्रात दोन बोटींची समोरासमोर भीषण धडक

India AI Impact Summit 2026 : एआय समिटमध्ये महाराष्ट्राचा डंका! कृषी विकासासाठी 'महाॲग्री एआय' ठरणार गेमचेंजर - मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे

Nitesh Rane : नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये मंत्री नितेश राणे यांचा सहभाग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल इंडिया'ला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देऊन

AI Authenticity Label : एआय-निर्मित डिजिटल कंटेंटसाठी ‘ऑथेंटिसिटी लेबल’ आजपासून अनिवार्य

केंद्र सरकारने एआयच्या मदतीने तयार होणाऱ्या डिजिटल कंटेंटबाबत कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. १०