Ganeshotsav 2024 : गणरायाच्या स्वागतासाठी BMC सज्ज! लवकरच मिळणार मंडप उभारण्याची परवानगी

  103

मुंबई : मुंबईकरांच्या घरी आणि विविध परिसरांमध्ये यंदा ७ सप्टेंबरपासून लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन (Ganeshotsav 2024) होणार आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईतील मोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन होण्यास सुरुवात होते. मात्र त्यासाठी मंडळांना महापालिकेकडून (BMC) दोन महिने आधीपासूनच मंडप बांधण्याची परवानगी घ्यावी लागते. मात्र यंदा मुंबई महापालिकेने परवानगी देण्यास विलंब केल्यामुळे गणेशोत्सव मंडळांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र आता महापालिका लवकरच गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी ऑनलाइन एक खिडकी योजना राबवून देणार आहे. त्यामुळे मंडळांना आता आणखी कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मुंबई महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव मंडळांसाठी मंडप उभारणी परवानगीसाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात एक खिडकी योजना सुरू केली जाणार आहे. त्याचसोबत अर्ज प्राप्त झाल्यापासून मंडळांना पाच ते सात दिवसांत परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न देखील करण्यात येणार आहे.


दरम्यान, या प्रक्रियेसाठी मंडळांकडून ऑनलाइन अर्ज केल्यानंतर महापालिका, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, स्थानिक पोलिसांची परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र हे विभाग कार्यालयातील एका खिडकीवरच उपलब्ध होते किंवा त्यासाठी मंडळांच्या सदस्यांना प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागते. तर काहीवेळा सदस्य वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस किंवा अन्य विभागतही जाऊन परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र घेतात. परंतु मंडळांचा होणारा खटाटोप वाचवण्यासाठी महापालिकेकडून मंडळांना विविध परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्रही मंडळांना ऑनलाइनच देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.