मुंबई: राज्याला पावसाने सध्या चांगलेच झोडपून काढले. राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण, मुंबई, ठाणे, पुणे या सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे.
गुरूवारीही सगळीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाकडून येत्या ४८ तासांत पावसाचा जोर अधिक वाढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पुण्यामध्ये येत्या ४८ तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे कोकणात रायगड तसेच रत्नागिरीमध्येही पावसाच्या मुसळधार सरी कोसळतील असा अंदाज आहे.
साताऱ्यामध्येही पावसाचा जोर अधिक असणार आहे. यासोबतच अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…