कर्जत मध्ये पावसाची संततधार, अनेक गावे वाड्या यांचा संपर्क तुटला

शाळा महाविद्यालये यांना सुट्टया जाहीर


कर्जत(नरेश कोळंबे)- कर्जत तालुक्यात तसेच लोणावळा खंडाळा घाटात ढगफुटी सदृश पाऊस पडत असून कर्जत खोपोली परिसरात सगळीकडे पाणी भरायला सुरुवात झाली आहे . लोणावळा येथून टाटा धरणातून पातळ गंगा नदीत सुद्धा अविरत विसर्ग होत आहे त्यामुळे सदरील सर्व भागांना धोक्याचा इशारा दिला आहे. याच धर्तीवर कर्जत मध्ये सुद्धा प्रशासन जागृत होत शाळा महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


२४ तारखेपासून कर्जत परिसरात संततधार पाऊस चालू आहे त्यामुळे उल्हास नदी तुडूंब भरून वाहत आहे. वाहणाऱ्या पाण्यामुळे सगळ्या सखल भागात पाणी साठले आहे व त्यामुळे कर्जत मधील अनेक गावांचा रस्ता पाण्याखाली गेल्याने त्या गावांचा संपर्क तुटला आहे. विद्यार्थी वर्गाने ह्या परिस्थितीत वाईट परिस्थिती ला सामोरे जाऊ नये म्हणून प्रशासन जागरूक झाले असून सर्व शाळा व महाविद्यालये यांना सुट्टीचे आदेश पारित केले आहेत.



ज्या ज्या गावांचा संपर्क तुटला त्या गावांमध्ये बीड खांडपे, कोंडीवडे सालपे , नेरळ दहिवली, अंथरट वरेडी , वावे बेंडसे आदि गावांचे रस्ते पाण्याने भरले असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.याच धर्तीवर प्रशासनाने सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक