Laxman Hake : शरद पवार हे मराठा आणि ओबीसी समाजात भांडणं लावताहेत!

  209

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही शरद पवार मूग गिळून गप्प


ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा हल्लाबोल


मुंबई : मराठा आणि ओबीसी समाजाने (Maratha VS OBC) केलेल्या परस्परविरोधी मागण्यांमुळे राज्य सरकार कोंडीत सापडलं आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांसह एकत्र बैठक बोलावली होती. मात्र, विरोधक या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. या सगळ्यामागे शरद पवार (Sharad Pawar) असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. त्यामुळे काल शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेत आरक्षणप्रश्नी तोडगा काढण्यासाठी चर्चा केली. या चर्चेनंतर मात्र शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवार साहेब ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत, अशी टीका आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली आहे.


बीडच्या चकलंबा गावात ओबीसी मेळाव्यात लक्ष्मण हाके म्हणाले, "मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लागलेली असताना शरद पवार शांत बसत आहेत. त्यांनी पुरोगामी भूमिका घ्यायला पाहिजे होती. त्यांच्या तोंडी नेहमी शाहू फुले आंबेडकरांचे नाव असते. जरांगे ज्यावेळी आम्ही आणि धनगर भाऊ भाऊ आहे असं म्हणतात. त्याचवेळी शरद पवार संधी साधतात".


पुढे हाके म्हणाले, "बारामतीमध्ये शरद पवार पिवळा रुमाल घालून, अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यक्रमात जावून, धनगरांच्या एसटी आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, असं सांगतात. पण एसटीच्या आमच्या चार पिढ्या या आंदोलनासाठी खपल्या असताना त्यावेळी त्यांची काहीच भूमिका नाही. त्यांनी एकदाची आपली भूमिका स्पष्ट करावी, आमच्यामध्ये भांडण लावू नये", असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतरही शरद पवार का बोलत नाहीत? ते का मूग गिळून गप्प आहेत? मुख्यमंत्र्याकडे मीटिंगला जाऊन शरद पवार फक्त पोहे खाऊन आले का ? गावगाडा विस्कळीत होत असताना बोलत नाहीत, हे न कळलेलं कोडं आहे, असा सवालही लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.



काय आहे मराठा विरुद्ध ओबीसी वाद?


राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ताबडतोब सगेसोयरेबाबत अधिसूनचा काढून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. सरकारला दिलेल्या अल्टिमेटमनंतर जरांगे यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे. तर दुसरीकडे, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अन्यथा मोठं आंदोलन करू, अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. त्यामुळे राज्य सरकार कोंडीत सापडलं असून तोडगा काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत