Health: गोड खाण्याची योग्य वेळ काय असते? घ्या जाणून

मुंबई: बऱ्याच लोकांना गोड पदार्थ खायला फार आवडते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ काय आहे? चुकीच्या वेळेस गोड पदार्थ खाल्ल्याने शरीरास नुकसान होते. अनेक जण सकाळी उठताच गोड खातात तर काहीजण रात्री झोपण्याआधी गोड पदार्थ खातात. जाणून घेऊया गोड खाण्याची योग्य वेळ कोणती?



सकाळच्या वेळेस गोड खाल्ले पाहिजे का?


सकाळचा नाश्ता हा दिवसातील महत्त्वाचे अन्न असते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की सकाळच्या वेळेस गोड खाल्ल्याने संपूर्ण दिवस खराब होतो. खरंतर गोड खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते. यामुळे थकवा, चिडचिड तसेच पोटातील त्रास वाढतो. गोड खाल्ल्याने प्रोटीन, फायबर, व्हिटामिन्ससारख्या पोषकतत्वांची कमतरता जाणवते.



गोड खाण्याची योग्य वेळ काय?


मिठाई खाण्याची योग्य वेळ दुपारी जेवणानंतर असते. कारण संपूर्ण दिवसात शरीराच्या कॅलरीज आरामात बर्न होतात. दुपारी जेवणानंतर तुम्ही गोड खाऊ शकता. मात्र सकाळी अथवा संध्याकाळच्या वेळेस गोड खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे