दु:खी का आहात, आपण चांगले काम केले आहे...पंतप्रधान मोदींनी भाजप कार्यकर्त्यांशी साधला संवाद

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरूवारी भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवताना म्हटले की दु:खी का आहात आपण चांगले काम केले आहे.


पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना म्हटले की आता आपल्याला पुढे पाहिले पाहिजे. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत लोकसभा निवडणूक २०२४च्या अनुभवाबद्दलही चर्चा केली. या दरम्यान पंतप्रधानांनी भाजपाच्या संघर्षाच्या आठवणी ताज्या करत पक्ष कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला.



निवडणुकीत काम केलेल्या कार्यकर्त्यांची घेतली भेट


या दरम्यान पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणुकीत काम केलेल्या पक्ष कार्यकर्त्यांची यावेळी भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी भाजप कार्यालयात दोन तासांहून अधिक वेळ घालवला. या दरम्यान त्यांनी भाजपच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही भेट घेतली. भाजपा कार्यालयात पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी स्वागत केले. २०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या मुख्यालयाचा दौरा केला होता आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली होती.



कार्यकर्त्यांना दिला बूस्टर डोस


लोकसभा निवडणूक २०२४मध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळालेले नव्हते. पक्षाला २४० जागांवरच समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीबाबत भाजप कार्यकर्त्यांमध्ये निराशा पाहायला मिळाली होती. कार्यकर्त्यांशी बातचीत करताना पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले तुमच्या मेहनतीत कोणतीच कसर नव्हती. त्यामुळे निकालाबाबत निराश होण्याची गरज नाही.

Comments
Add Comment

कॅप्टन सभरवाल मानसिक तणावाखाली, आत्महत्येचा विचार करत होते? ९१ वर्षीय वडिलांकडून चौकशीची मागणी

एअर इंडिया विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल दिशाभूल करणारा! मृत वैमानिक सुमित सभरलवाल यांच्या वडिलांचा आरोप नवी

अमेरिकेतली धक्कादायक घटना, पोलीस गोळीबारात भारतीय इंजिनिअरचा मृत्यू

हैदराबाद : तेलंगणातील ३२ वर्षांच्या मोहम्मद निजामुद्दीनचा अमेरिकेत स्थानिक पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला.

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक