दु:खी का आहात, आपण चांगले काम केले आहे...पंतप्रधान मोदींनी भाजप कार्यकर्त्यांशी साधला संवाद

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरूवारी भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवताना म्हटले की दु:खी का आहात आपण चांगले काम केले आहे.


पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना म्हटले की आता आपल्याला पुढे पाहिले पाहिजे. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत लोकसभा निवडणूक २०२४च्या अनुभवाबद्दलही चर्चा केली. या दरम्यान पंतप्रधानांनी भाजपाच्या संघर्षाच्या आठवणी ताज्या करत पक्ष कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला.



निवडणुकीत काम केलेल्या कार्यकर्त्यांची घेतली भेट


या दरम्यान पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणुकीत काम केलेल्या पक्ष कार्यकर्त्यांची यावेळी भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी भाजप कार्यालयात दोन तासांहून अधिक वेळ घालवला. या दरम्यान त्यांनी भाजपच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही भेट घेतली. भाजपा कार्यालयात पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी स्वागत केले. २०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या मुख्यालयाचा दौरा केला होता आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली होती.



कार्यकर्त्यांना दिला बूस्टर डोस


लोकसभा निवडणूक २०२४मध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळालेले नव्हते. पक्षाला २४० जागांवरच समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीबाबत भाजप कार्यकर्त्यांमध्ये निराशा पाहायला मिळाली होती. कार्यकर्त्यांशी बातचीत करताना पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले तुमच्या मेहनतीत कोणतीच कसर नव्हती. त्यामुळे निकालाबाबत निराश होण्याची गरज नाही.

Comments
Add Comment

‘मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे’; स्टेजवरूनच प्रांजल दहियाने गैरवर्तन करण्याऱ्या प्रेक्षकांना सुनावले खडेबोल

हरियाणा : हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना प्रांजल दहिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एका लाइव्ह

टाटा–एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसला भीषण आग, २० हून अधिक प्रवासी जखमी, १ मृत्यू

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री भीषण रेल्वे अपघात घडला.

चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी निविदा िनघणार

पाकिस्तानचे पाणी थांबणार नवी दिल्ली : भारताने जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर २६० मेगावॅट

राहुल बाबा, इतक्यात थकू नका; अजून बरेच पराभव पाहायचे आहेत

गृहमंत्री अमित शहा यांचा टोला अहमदाबाद : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आताच थकून

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'