स्वस्त आणि मस्त Airtelने सादर केले तीन नवे प्लान, मिळणार अनलिमिटेड ५जी डेटा

मुंबई: एअरटेलने नुकतेच आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. टेलिकॉम कंपनीने घोषणा केली आहे की त्यांनी एंट्री लेव्हल प्लानच्या किंमतीत ७० पैशांची वाढ केली आहे. आता कंपनीने काही नवे बूस्टर पॅक सादर केले आहेत. एअरटेलने ५१ रूपयांचा, १०१ रूपयांचा आणि १५१ रूपयांचे तीन नवे बूस्टर पॅक सादर केले आहेत. नव्या टॉप अप डेटा प्लानमुळे युजर्सला अनलिमिटेड ५जी डेटाचा फायदा मिळेल.



नवे ५जी डेटा पॅक


एअरटेलने ५१ रूपयांपासून सुरू होणारे तीन नवे डेटा पॅक सादर केले आहेत. कंपनीने घोषणा केली आहे की युजर्सला अपग्रेड करण्यासाठी दररोज १ जीबी अथवा १.५ जीबी डेटा मिळणार तसेच ग्राहकांना ५जी स्पीड डेटा मिळेल.


एअरटेलने ५१ रूपये, १०१ रूपये आणि १५१ रूपयांचे बूस्टर प्लान सादर केले आहेत. कंपनीच्या ५१ रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ३ जीबी ४जी डेटा, १०१ रूपयांच्या प्लानमध्ये ६ जीबी ४जी डेटा आणि १५१ रूपयांच्या प्लानमध्ये ९ जीबी ४जी डेटा मिळणार आहे. हे नवे डेटा पॅक सध्याच्या पॅकसोबत अॅक्टिव्हेट करू शकणार आणि अनलिमिटेड ५जी एन्जॉय करू शकणार आहे. याची व्हॅलिडिटी सध्याच्या प्लानइतकी असणार आहे.


किंमती वाढवल्यानंतर एअरटेलचा सर्वात स्वस्त ५जी प्लान २४९ रूपयांचा आहे. तर पोस्टपेड प्लान ४४९ रूपयांचा आहे. या प्लानबद्दल बोलायचे झाल्यास ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल्स, २४ दिवसाची व्हॅलिडिटी, विंकवर १ फ्री हॅलोट्यून आणि विंक म्युझिकचा अॅक्सेस दिला जातो.

Comments
Add Comment

एमएमआरडीएचा २०१७–१८ नंतर प्रथमच अधिशेष अर्थसंकल्प

₹४८,०७२.५७ कोटींच्या आराखड्यामुळे आर्थिक परिवर्तनाचा नवा टप्पा आणि पायाभूत सुविधांना गती प्रकल्पांसाठी ८७%

Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ चे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प!

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिकृत दिनदर्शिका जाहीर झाली आहे. हे

प्रवासी आणि पादचाऱ्यांसाठी अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करणार; मंत्री मंगलप्रभात लोढा

याबाबत कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक विजय कुमार यांची घेतली भेट मुंबई

पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी करावी; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

यंदा डोंगरी महोत्सव एप्रिल मध्ये मुंबई : राज्यातील पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी होण्यासाठी पर्यटन

ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी; मंत्री भरत गोगावले यांचे विधान 

'सक्षम २०२५-२६' अभियानाचा समारोप मुंबई : इंधनाची बचत ही केवळ गरज नसून ती एक देशसेवा आहे. ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुंबईत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे