स्वस्त आणि मस्त Airtelने सादर केले तीन नवे प्लान, मिळणार अनलिमिटेड ५जी डेटा

  1601

मुंबई: एअरटेलने नुकतेच आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. टेलिकॉम कंपनीने घोषणा केली आहे की त्यांनी एंट्री लेव्हल प्लानच्या किंमतीत ७० पैशांची वाढ केली आहे. आता कंपनीने काही नवे बूस्टर पॅक सादर केले आहेत. एअरटेलने ५१ रूपयांचा, १०१ रूपयांचा आणि १५१ रूपयांचे तीन नवे बूस्टर पॅक सादर केले आहेत. नव्या टॉप अप डेटा प्लानमुळे युजर्सला अनलिमिटेड ५जी डेटाचा फायदा मिळेल.



नवे ५जी डेटा पॅक


एअरटेलने ५१ रूपयांपासून सुरू होणारे तीन नवे डेटा पॅक सादर केले आहेत. कंपनीने घोषणा केली आहे की युजर्सला अपग्रेड करण्यासाठी दररोज १ जीबी अथवा १.५ जीबी डेटा मिळणार तसेच ग्राहकांना ५जी स्पीड डेटा मिळेल.


एअरटेलने ५१ रूपये, १०१ रूपये आणि १५१ रूपयांचे बूस्टर प्लान सादर केले आहेत. कंपनीच्या ५१ रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ३ जीबी ४जी डेटा, १०१ रूपयांच्या प्लानमध्ये ६ जीबी ४जी डेटा आणि १५१ रूपयांच्या प्लानमध्ये ९ जीबी ४जी डेटा मिळणार आहे. हे नवे डेटा पॅक सध्याच्या पॅकसोबत अॅक्टिव्हेट करू शकणार आणि अनलिमिटेड ५जी एन्जॉय करू शकणार आहे. याची व्हॅलिडिटी सध्याच्या प्लानइतकी असणार आहे.


किंमती वाढवल्यानंतर एअरटेलचा सर्वात स्वस्त ५जी प्लान २४९ रूपयांचा आहे. तर पोस्टपेड प्लान ४४९ रूपयांचा आहे. या प्लानबद्दल बोलायचे झाल्यास ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल्स, २४ दिवसाची व्हॅलिडिटी, विंकवर १ फ्री हॅलोट्यून आणि विंक म्युझिकचा अॅक्सेस दिला जातो.

Comments
Add Comment

Bob and HDFC Bank : पीएनबीसह बँक ऑफ बडोदा व एचडीएफसी बँकेने केली कर्जदारात कपात 'या' टक्क्यांवर घसरले आहेत व्याजदर !

प्रतिनिधी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी रेपो दरात (Repo Rate ) दरात कपात केल्यानंतर आता त्याचा परिणाम बँकेच्या

सांडपाणीमुक्त पवई तलावासाठी लढा सुरूच

मूक साखळी रद्द, मात्र नागरिकांचा निर्धार कायम मुंबई : पवई तलावात सांडपाणी मिसळण्याच्या विरोधात रविवारी आयोजित

मुंबईत अवकाळी पावसाचा सुक्या मासळीला फटका

कोळी महिला व्यावसायीकांची सरकारकडे आर्थिक मदत देण्याची मागणी मुंबई : अवकाळी पावसाचा फटका सुकी मासळीलाही बसला

'म्हाडा, सिडको लॅाटरीत डबेवाल्यांना ५ टक्के आरक्षण द्या'

मुंबई :'म्हाडाच्या आणि सिडको यांच्यावतीने जी नविन घरे बांधण्यात येतील त्यामध्ये ५ टक्के आरक्षण डबेवाला कामगार

मुंबई मेट्रो १ ला प्रवाशांची पसंती

११ वर्षांत १११ कोटी प्रवासी मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो १ मार्गाला प्रवाशांची मोठी पसंती मिळाली

‘आता मोबाइल ही चैनेची वस्तू राहिलेली नाही’

मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी मुंबई:आजच्या जमान्यात मोबाईल ही केवळ चैनेची वस्तू राहिलेली नाही तर ती काळाची