Hardik Natasa Divorce: हार्दिक पांड्या-नताशाचा घटस्फोट, सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर

मुंबई: टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टेनकोविकशी घटस्फोट झाला आहे. नताशाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. नताशाने सोशल मिडिया पोस्टमध्ये लिहिले की ते दोघेही एकमेकांच्या सहमतीने वेगळे झाले आहेत.


हार्दिक आणि नताशाने २०२०मध्ये लग्न केले होते. मात्र लग्नाच्या ४ वर्षानंतर ते आता वेगळे झाले आहेत. नताशाने घटस्फोटाच्या पोस्टमध्ये अगस्त्याबद्दलही लिहिले आहे.


नताशाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिले, तब्बल ४ वर्षांनी मी आणि हार्दिक एकमेकांच्या सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघांनी एकत्र राहून सर्वश्रेष्ठ दिले. मात्र आता दोघांनी हा निर्णय घेतला. हा आमच्यासाठी खूप कठीण निर्णय आहे. अगस्त्य आमच्या दोघांच्या जीवनाचा भाग आहे. आम्ही दोघेही त्याला सर्व आनंद देण्याचा प्रयत्न करू.


 


हार्दिक आणि नताशाने एकच पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या दोघांनी २०२०मध्ये लग्न केले होते. पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. मात्र आता दोघांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. पांड्या आणि नताशाने ३१ मे २०२०मध्ये लग्न केले होते. याचवर्षी त्यांचा मुलगा अगस्त्यचा जन्म झाला.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख