Tuljabhavani Devi : तुळजाभवानी देवीला चॉकलेटनंतर वेलची आणि लवंगाचा हार!

हार नाकारल्याने भाविकांमध्ये संतापाचे वातावरण


धाराशिव : छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) आराध्यदैवत तुळजाभवानी (Tuljabhavani Devi) म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी. मात्र आई तुळजाभवानीचे मंदिर यावेळी वेगळ्याच गोष्टींसाठी चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी मंदिर संस्थानातल्या ५० पेक्षा जास्त महत्त्वाच्या फाईल्स गायब झाल्या होत्या. त्यानंतर देवीचे पुरातन आणि मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने देखील चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर मागील आठवड्यात तुळजाभवानी देवीला एका भक्ताने दिलेला चॉकलेटचा हार (Chocolate Necklace) अर्पण केला होता व पुजाऱ्याने मंदिर संस्थानच्या परवानगीने तो देवीच्या गळ्यात घातला होता. या प्रकरणामुळे तुळजाभवानी देवी मंदिर संस्था वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.


हे प्रकरण ज्वलंत असतानाच आता देवीला भक्तांनी वेलची आणि लवंगाचा (Elaichi And cloves) हार अर्पण केला. मात्र हा हार नाकारल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाचा पुन्हा एकदा नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



भोपे पुजारी मंडळाची नाराजी


भाविकांनी तुळजाभवानी देवीला चॉकलेटच्या हार आणल्यानंतर वेलची आणि लवंगाचा हार देखील अर्पण केला. मात्र मंदिर प्रशासनाने तो हार न घातल्यामुळे भाविक आणि भोपे पुजारी मंडळातून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर, भाविकांनी मोठ्या श्रध्देने देवीला वाहण्यासाठी काहीना काही आणलेले असते. मात्र मंदिर प्रशासन चुकीच्या लोकांच्या मागणीला ग्राह्य धरुन भक्तांनी आणलेल्या गोष्टी नाकारुन त्यांच्यावर अन्याय करत आहे. काही भक्तांनी आणलेल्या साड्या देखील देवीला चढवल्या जात नाहीत, त्यामुळे लोकांच्या मागणीला ग्राह्य धरुन मंदिर प्रशासन किती दिवस अन्याय करणार? असा प्रश्न अमरराजे कदम यांनी उपस्थित केला.

Comments
Add Comment

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस

Gahininath fort : गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न बीड : म्हसोबावाडी (ता.

All priests will earn the same : मंदिरांतील पुजाऱ्यांचे मानधन एकसमान होणार

राज्य सरकार धोरण ठरवणार; मंत्रालयात झाली विशेष बैठक मुंबई : काही देवस्थानांमध्ये पुजाऱ्यांना नियमित वेतन दिले

Jalna Murder Case : आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी ठरवलेला दिवसच ठरला अंतिम, पोटच्या मुलानेच केली निघृण हत्या

जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या