कोकणात पावसाचा धुमाकूळ, रत्नागिरीत शाळा-कॉलेजना सुट्टी, कोकण रेल्वे अजूनही ठप्प

  82

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाने धुमशान घातले आहे. रत्नागिरी तसेच रायगड जिल्ह्याला तर पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी तसेच रायगड जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.


रत्नागिरी जिल्ह्यातील रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. कोसळत असलेल्या संततधारेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा तसेच कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या जिल्ह्यातील सर्व शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत.



कोकण रेल्वे ठप्प


मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. विन्हेरे ते दिवाणखवटी या स्थानकादरम्यान दरड कोसळल्याने माती संपूर्ण ट्रॅकवर आली आहे. यामुळे रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे. दरम्यान, काही गाड्या विविध रेल्वे स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. प्रवाशांचे मात्र यामुळे प्रचंड हाल होत आहेत.


कोकण रेल्वे गेल्या १३ तासांपासून ठप्प आहे. यामुळे प्रवाशांचे मात्र अतोनात हाल झाले आहेत. अनेक रेल्वे गाड्या स्थानकांमध्ये अडकून पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

रेल्वे क्रमांक 22229 मुंबई सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.


तर मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, मडगाव-मुंबई तेजस एक्सप्रेस, मडगाव-मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस, तसे सावंतवाडी-दादर तुतारी एक्सप्रेस या रेल्वे गाड्या केवळ रत्नागिरीपर्यंतच धावणार आहे.

Comments
Add Comment

सरकार क्रीडा क्षेत्राला चालना देत आहे : चंद्रशेखर बावनकुळे

शेवगाव : आपले सरकार क्रीडा धोरण पुढे घेऊन जात गावा-गावात खेलो इंडियाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला चालना

राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आली, तर खरी क्रांती : शिवगिरी महाराज

संगमनेर : धर्माच्या कार्यासाठी आणि प्रचार व प्रसार करण्यासाठी राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आली तर खरी क्रांती

​Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर​ चार महिन्यांत ११ बळी!

मुंबई- पुणे या सहा पदरी महामार्गावरील आजघडीला दररोज लाखो वाहने धावतात. यशवंतराव चव्हाण द्रूतगती मार्ग म्हणून

Pune News : बकरी ईद निमित्त पुण्यातील ‘हे’ रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते वाचा

पुणे : मुस्लिम बांधवांसाठी बकरी ईद हा एक महत्वाचा सण आहे. देशभरात ७ जून रोजी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली

Rajgad Fort : पतीसह गेली राजगड फिरायला; पाय घसरला अन् थेट १५० फूट दरीत कोसळली

पुणे : पुण्यातील राजगडावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. पावसाळा सुरु होताच अनेकांनी गाद किल्ले फिरायला सुरुवात केली

राज ठाकरे लागले कामाला, पक्षात मोठे फेरबदल, ९ जूनला ठाकरेंचा दौरा

पुणे :  पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुण्यात