कोकणात पावसाचा धुमाकूळ, रत्नागिरीत शाळा-कॉलेजना सुट्टी, कोकण रेल्वे अजूनही ठप्प

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाने धुमशान घातले आहे. रत्नागिरी तसेच रायगड जिल्ह्याला तर पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी तसेच रायगड जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.


रत्नागिरी जिल्ह्यातील रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. कोसळत असलेल्या संततधारेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा तसेच कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या जिल्ह्यातील सर्व शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत.



कोकण रेल्वे ठप्प


मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. विन्हेरे ते दिवाणखवटी या स्थानकादरम्यान दरड कोसळल्याने माती संपूर्ण ट्रॅकवर आली आहे. यामुळे रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे. दरम्यान, काही गाड्या विविध रेल्वे स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. प्रवाशांचे मात्र यामुळे प्रचंड हाल होत आहेत.


कोकण रेल्वे गेल्या १३ तासांपासून ठप्प आहे. यामुळे प्रवाशांचे मात्र अतोनात हाल झाले आहेत. अनेक रेल्वे गाड्या स्थानकांमध्ये अडकून पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

रेल्वे क्रमांक 22229 मुंबई सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.


तर मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, मडगाव-मुंबई तेजस एक्सप्रेस, मडगाव-मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस, तसे सावंतवाडी-दादर तुतारी एक्सप्रेस या रेल्वे गाड्या केवळ रत्नागिरीपर्यंतच धावणार आहे.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक