Shirdi News : दारुच्या नशेने घेतला तरुणाचा जीव! मित्रांसोबत केली पार्टी, नशेत टेरेसवर गेला अन्...

  180

शिर्डी : शिर्डीहून एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ड्रिंक अँड ड्राईव्ह (Drink And Drive) अपघाताच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशी दारुची नशा (Alcoholism) अनेकांचा जीव घेतानाचे चित्र दिसून येत आहे. अशातच शिर्डीमध्येही एका तरुणाचा दारुच्या नशेत जीव गेल्याची घटना घडली आहे.


बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातून शिर्डीला (Shirdi) आलेल्या तरुणाचा दारूच्या नशेत हॉटेलच्या टेरेसवरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शिर्डी पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



नेमके प्रकरण काय?


शिर्डी जवळील निमगाव कोऱ्हाळे येथील हॉटेल साई सिमरन येथे हा प्रकार घडला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चार मित्र फिरण्यासाठी शिर्डीत आले होते. ते एका हॉटेलमध्ये थांबले होते. परंतु हे चार मित्र हॉटेलमध्ये दारू पिऊन फिरण्यासाठी हॉटेलच्या टेरेसवर गेले. परंतु यावेळी शुभम नारखेडे (२५) या तरुणाचा दारूच्या नशेमुळे तोल गेल्यामुळे तो थेट टेरेसवरून खाली पडला. उंचावरून खाली पडल्यामुळे या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरूण दारूच्या नशेत होता. त्यामुळे तोल जावून पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या