Nashik News : अबब! नाशिकमध्ये आढळला तब्बल ३१४ किलो बनावट पनीरचा साठा

  260

नाशिकच्या अन्न औषध प्रशासनाने सापळा रचून टाकली धाड


नाशिक : भेसळयुक्त पदार्थांची (Adulterated substances) विक्री करुन नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात. विक्रेते आपल्या फायद्यासाठी भेसळयुक्त पदार्थ विकतात मात्र ते खाणाऱ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. अशातच आता नाशिकमधून एक धक्कादायक बातमी (Nashik news) समोर आली आहे. नाशिकच्या एका दूध कंपनीकडे तब्बल ३१४ किलो पनीरचा साठा आढळला. नाशिक पोलिसांनी (Nashik Police) हा साठा तसेच भेसळयुक्त पनीर बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त केला आहे.


नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून भेसळयुक्त अन्न पदार्थांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून (Food and Drug Administration) कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून कार्यालयास सिन्नर (Sinnar) येथील मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील (Musalgaon MIDC) दूध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या मे. यशवी मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्टस (Yashvi Milk and Milk Products) विषयी गुप्त माहिती मिळाली होती.


या माहितीच्या आधारे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून धाड (Raid) टाकली असता त्याठिकाणी भेसळयुक्त पनीरचे उत्पादन विक्रीसाठी सुरु असल्याचे आढळले. अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी सदर कारखान्याची अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत सखोल तपासणी केली असता यावेळी ५३ हजार ३८० रुपये किंमतीच्या ३१४ किलो भेसळयुक्त पनीरचा (Fake Paneer) साठा जप्त करण्यात आला. तसेच पनीर बनविण्यासाठी रिफाईंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर, ग्लिसॉरॉल मोनो स्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा वापर करण्यात येत होता. त्यांचे नमुने घेवून हा साठा जप्त केला आहे.


ही कारवाई सहआयुक्त नाशिक विभाग शैलेश आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) उदयदत्त लोहकरे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) अविनाश दाभाडे व अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन, योगेश देशमुख, नमुना सहायक विकास विसपुते, वाहनचालक साबळे या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणी घेतलेले नमुने अन्न विश्लेषक, अन्न चाचणी प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या