Nashik News : अबब! नाशिकमध्ये आढळला तब्बल ३१४ किलो बनावट पनीरचा साठा

  247

नाशिकच्या अन्न औषध प्रशासनाने सापळा रचून टाकली धाड


नाशिक : भेसळयुक्त पदार्थांची (Adulterated substances) विक्री करुन नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात. विक्रेते आपल्या फायद्यासाठी भेसळयुक्त पदार्थ विकतात मात्र ते खाणाऱ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. अशातच आता नाशिकमधून एक धक्कादायक बातमी (Nashik news) समोर आली आहे. नाशिकच्या एका दूध कंपनीकडे तब्बल ३१४ किलो पनीरचा साठा आढळला. नाशिक पोलिसांनी (Nashik Police) हा साठा तसेच भेसळयुक्त पनीर बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त केला आहे.


नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून भेसळयुक्त अन्न पदार्थांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून (Food and Drug Administration) कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून कार्यालयास सिन्नर (Sinnar) येथील मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील (Musalgaon MIDC) दूध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या मे. यशवी मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्टस (Yashvi Milk and Milk Products) विषयी गुप्त माहिती मिळाली होती.


या माहितीच्या आधारे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून धाड (Raid) टाकली असता त्याठिकाणी भेसळयुक्त पनीरचे उत्पादन विक्रीसाठी सुरु असल्याचे आढळले. अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी सदर कारखान्याची अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत सखोल तपासणी केली असता यावेळी ५३ हजार ३८० रुपये किंमतीच्या ३१४ किलो भेसळयुक्त पनीरचा (Fake Paneer) साठा जप्त करण्यात आला. तसेच पनीर बनविण्यासाठी रिफाईंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर, ग्लिसॉरॉल मोनो स्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा वापर करण्यात येत होता. त्यांचे नमुने घेवून हा साठा जप्त केला आहे.


ही कारवाई सहआयुक्त नाशिक विभाग शैलेश आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) उदयदत्त लोहकरे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) अविनाश दाभाडे व अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन, योगेश देशमुख, नमुना सहायक विकास विसपुते, वाहनचालक साबळे या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणी घेतलेले नमुने अन्न विश्लेषक, अन्न चाचणी प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित